"पाकचा विजय साजरा करणाऱ्यांची बाजू घेणाऱ्या मेहबुबा मुफ्तींनी भारतीयत्व सिद्ध करावं"

"पाकचा विजय साजरा करणाऱ्यांची बाजू घेणाऱ्या मेहबुबा मुफ्तींनी भारतीयत्व सिद्ध करावं"

नवी दिल्ली : टी-20 वर्ल्डकपमध्ये भारताला पाकिस्तानकडून पराभवाचा सामना करावा लागला आहे. इतिहासात पहिल्यांदाच याप्रकारे पाकिस्तानविरुद्ध भारत पराभूत झाला आहे. त्यामुळे देशभरातील क्रिकेट चाहते सध्या नाराज आहेत. मात्र दुसरीकडे, पाकिस्तानच्या या विजयाचे वेगवेगळे पडसाद उमटताना दिसून आले. जम्मू-काश्मीरमधील काही भागात पाकिस्तानच्या विजयाच्या आनंद साजरा केला गेला. पाकिस्तानचा विजयोत्सव साजरा केल्यावर हरकत काय आहे? पाकिस्तानच्या विजयाचा आनंद साजरा करणार्‍यांची बाजू मांडण्याचा प्रयत्न करत त्यांनी काश्मीरींविरोधात संताप प्रकट करणाऱ्या लोकांना विराट कोहलीकडून शिकण्याचा सल्ला दिला आहे. त्यांच्या या ट्विटला आता हरयाणा सरकारमधील मंत्री अनिल वीज यांनी प्रत्युत्तर दिलंय.

"पाकचा विजय साजरा करणाऱ्यांची बाजू घेणाऱ्या मेहबुबा मुफ्तींनी भारतीयत्व सिद्ध करावं"
अज्ञात NCB अधिकाऱ्याच्या 'त्या' पत्रात काय म्हटलंय? वाचा सविस्तर

त्यांनी म्हटलंय की, मेहबुबा मुफ्ती यांचा डीएनए सदोष आहे. त्या कितपत भारतीय आहेत, हे त्यांनी सिद्ध करायला हवं. असं मत हरयाणा सरकारमधील मंत्री अनिल वीज यांनी म्हटलंय.

काय म्हटलंय मेहबुब मुफ्तींनी?

मेहबुबा मुफ्ती यांनी ट्विट करत म्हटलंय की, “पाकिस्तानच्या विजयाचा आनंद साजरा करणाऱ्या काश्मिरींवर एवढा राग कशासाठी? देश के गद्दार को, गोली मारो… अशा प्रकारच्या घोषणाही काही लोक देत आहेत. जम्मू-काश्मीरचा विशेष दर्जा काढून घेतल्यावर कितीतरी लोकांनी मिठाई वाटून आनंद साजरा केला होता, हे कोणीही विसरू शकणार नाही. विराट कोहलीप्रमाणे याकडे योग्य भावनेने पाहा. विराट कोहलीने सर्वप्रथम पाकिस्तानी संघाचे अभिनंदन केले आहे,” असे मेहबुबा मुफ्ती यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलंय. मेहबुबा मुफ्तींनी या ट्विटमध्ये विराट कोहलीचा एक फोटोही शेअर केला आहे, ज्यात तो पाकिस्तानी फलंदाज रिझवानशी बोलताना दिसत आहे.

"पाकचा विजय साजरा करणाऱ्यांची बाजू घेणाऱ्या मेहबुबा मुफ्तींनी भारतीयत्व सिद्ध करावं"
गृहमंत्री स्वत: काश्मीरमध्ये असताना पाकच्या विजयाचा जल्लोष गंभीर: संजय राऊत

दुबईमध्ये गेल्या रविवारी भारत आणि पाकिस्तान यांच्यात झालेल्या टी 20 विश्वचषक सामन्यात भारताच्या क्रिकेट संघाला पराभवाचा सामना करावा लागला आहे. 2007 ते 2016 या दरम्यानच्या काळात भारत विश्वचषकाच्या सामन्यात पाकिस्तानकडून कधीही हरलेला नाही. मात्र, आता भारत पराभूत झाल्याचं पहायला मिळालंय. भारताच्या पराभवानंतर पाकिस्तानात हवेत गोळीबार केल्याच्या बातम्या येत आहेत. कराचीमध्येच एका उपनिरीक्षकासह अनेक ठिकाणी गोळीबारात १२ जणांना गोळ्या लागल्या आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com