काश्‍मिरात मोबाईल एसएमएस सेवा बंद

Article-370-Cancel
Article-370-Cancel

श्रीनगर - काश्‍मीर खोऱ्यात पोस्टपेड सेवा सुरू होऊन चोवीस तास उलटत नाही तोच खबरदारीचे उपाय म्हणून एसएमएस सेवा बंद करण्यात आली. काश्‍मीरमध्ये सोमवारी ७२ दिवसांच्या खंडानंतर पोस्टपेड मोबाईल सेवा बहाल करण्यात आली होती. मात्र इंटरनेट सेवा अद्याप स्थगितच आहे.

मोबाईलची एसएमएस सेवा काल सायंकाळी पाच वाजताच बंद करण्यात आली. राज्यातील २५ लाखांहून अधिक प्रीपेड मोबाईल सेवा आणि सोशल मीडियासह अन्य इंटरनेट सेवाही सध्या बंद राहणार असल्याचे अधिकाऱ्याने सांगितले. राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी काल इंटरनेट सेवा लवकरच सुरू करण्याचे सूतोवाच केले होते. मात्र सुरक्षा दलाच्या मते ही सेवा सुरू होण्यास अद्याप दोन महिन्यांचा कालावधी लागू शकतो. प्रीपेड सेवेबाबत पुढील महिन्यात निर्णय घेता येईल. मात्र पोस्टपेड सेवा सुरू झाल्याने बाह्यजगाशी संपर्क पुन्हा साधला जाईल, अशी आशा काश्‍मिरी नागरिकांनी व्यक्त केली आहे. 

दरम्यान, आजही काश्‍मीर खोऱ्यात दुकाने, बाजारपेठ, सार्वजनिक वाहतूक बंद होती. परंतु खासगी वाहने, ऑटोरिक्षा, टॅक्‍सीची वर्दळ अनेक भागात दिसली. श्रीनगरच्या रस्त्यावर फेरीवाले देखील होते. काश्‍मीरच्या पालकांनी आपल्या पाल्यांना अजूनही शाळेत न पाठविल्याने आजही शैक्षणिक संस्थांत शुकशुकाट जाणवत होता. सरकारी कार्यालयातील कर्मचाऱ्यांची उपस्थिती साधारण नोंदली गेली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News
www.esakal.com