दहशतवादी हल्ल्यानंतर, 2012 मधील मोदी अन् 2019 मधील राहुल गांधी

दहशतवादी हल्ल्यानंतर, 2012 मधील मोदी अन् 2019 मधील राहुल गांधी

नवी दिल्ली : केंद्रात काँग्रेसप्रणीत संयुक्त पुरोगामी आघाडीचे (यूपीए) सरकार असताना दहशतवाद्यांनी हल्ल्यानंतर विरोधी पक्षात असलेल्या नरेंद्र मोदी यांनी दहशतवादी हल्ल्याला सरकारला जबाबदार धरले होते. आज तेच काँग्रेस विरोधी पक्षात असताना सरकारच्या पाठिशी असल्याचे बोलत असल्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

मोदी यांनी 2012 मध्ये भारतात झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर बोलताना म्हटले होते, की भारत एवढा असहाय्य असेल हे दुर्भाग्यपूर्ण आहे. यासाठी पूर्णपणे केंद्र सरकार जबाबदार आहे. त्यांच्या निती, उदासिनता याला देश माफ करणार नाही. तर, दुसरीकडे राहुल गांधी यांनी पुलवामातील हल्ल्यानंतर पत्रकार परिषेद घेत म्हटले, की कोणतीही शक्ती आपल्या देशाला तोडू शकत नाही. विरोधी पक्ष पूर्णपणे लष्कर आणि सरकारच्या पाठिशी आहे. हा हल्ला भारताच्या आत्म्यावर हल्ला झाला आहे. ज्यांनी हे केले आहे त्यांना वाटले नाही पाहिजे की देश एकसंध नाही.
 


काँग्रेस समर्थकांकडून हे दोन्ही व्हिडिओ एकत्र करून सोशल मीडियावरून व्हायरल करण्यात येत आहेत. त्यात त्यांनी मोदींचा राष्ट्रवाद फेक असल्याचे म्हटले आहे, तसेच मतांचे राजकारण करण्यात येत असल्याचाही आरोप केला आहे. मोदींनी काही वर्षांपूर्वी केलेल्या वक्तव्ये आणि आताची स्थिती याबाबतचेही काही व्हिडिओ शेअर केले आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com