नवी दिल्ली : ''मागील चार वर्षांत भाजप सरकारने शेतकऱ्यांचे एक रुपयाही कर्ज माफ केले नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी श्रीमंत आणि गरीब असे भारताचे दोन तुकडे केले. श्रीमंत हेलिकॉप्टरने आकाशात उड्डाण करतो. अन् याचा खाली असलेल्या लोकांचा काहीही संबंध नसतो'', अशा शब्दांत काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनी पंतप्रधान मोदींवर आज (बुधवार) निशाणा साधला.
राजस्थानच्या भरतपूरमध्ये एका रॅलीला संबोधित करताना राहुल गांधी बोलत होते. यावेळी त्यांनी विविध मुद्यांवरून मोदी सरकारला धारेवर धरले. तसेच त्यांनी राफेल करारावरून सवालही उपस्थित केले आहेत. राहुल गांधी म्हणाले, ''देशात रोजगार ही एक मोठी समस्या आहे. मात्र, भाजप सरकारचे याकडे लक्ष नाही. काही लोकांना फायदा व्हावा, यासाठी मोदी सरकार काम करत आहे. त्यामुळे देशातील सर्वसामान्य जनता निराश आहे. भाजप सरकारने शेतकऱ्यांचे एक रुपयाचेही कर्ज माफ केले नाही''.
तसेच ते पुढे म्हणाले, ''राजस्थानात आमचे सरकार सत्तेवर आल्यास रोजगार देण्यास 24 तास प्रयत्न करु. मात्र, आम्ही खोटं बोलणार नाही. आम्ही आपल्याला दरवर्षी दोन कोटी नोकरी देऊ. त्यानंतर तुमच्या बँक खात्यात 15 लाख देऊ, असे आश्वासन तुम्हाला देणार नाही. मात्र, बेरोजगारांना रोजगारासाठी 24 तास मदत करू''.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.