नवी दिल्ली : काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली. त्यांच्यावर टीका करताना संरक्षणमंत्री निर्मला सीतारामन यांच्याबाबत त्यांनी अनुद्गार काढले, असे सांगत राष्ट्रीय महिला आयोगानं (एनडब्ल्यूसी) राहुल गांधी यांच्याकडे स्पष्टीकरण मागितले आहे. याबाबत एनडब्ल्यूसीने त्यांना नोटीसही पाठवली आहे.
राजस्थानमधील एका जाहीर सभेत बोलताना राहुल गांधी म्हणाले, की ''पंतप्रधान नरेंद्र मोदी घाबरले आहेत. त्यामुळेच आपल्या बचावासाठी त्यांनी महिला मंत्र्याला पुढे केले आहे''. त्यांच्या या वक्तव्यावरून राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा रेखा शर्मा यांनी नाराजी व्यक्त केली. त्या म्हणाल्या, ''राहुल गांधी यांनी पुरुषप्रधान मानसिकतेतून हे वक्तव्य केले आहे. आयोगाने राहुल गांधी यांना नोटीस बजावली आहे. राहुल गांधी महिलांना कमकुवत मानतात का?'' असा सवालही त्यांनी केला. तसेच राहुल गांधींचं वक्तव्य महिलांची निंदा करणारे आणि अपमानजनक आहे, असेही रेखा शर्मा यांनी म्हटले आहे.
दरम्यान, राहुल गांधी यांना नोटीस बजावून त्यांच्या या वक्तव्यामागे त्यांचा नेमका काय उद्देश आहे, याबाबत आयोगाने स्पष्टीकरण मागितले आहे, असे शर्मा यांनी सांगितले.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.