नवी दिल्ली : अतिमहत्वाच्या व्यक्तींच्या (VIP) वाहनावरील लाल दिवा हटविण्याच्या निर्णयाबाबत बोलताना नरेंद्र मोदी यांनी 'न्यू इंडिया' हा VIP चा नसून EPI (Every Person is important) चा असल्याचे सांगत देशातील प्रत्येक नागरिक महत्वाचा असल्याचे प्रतिपादन 'मन की बात' कार्यक्रमात बोलताना केले.
'मन की बात' या रेडिओवरील कार्यक्रमाच्या 31 व्या भागात मोदी बोलत होते. ते म्हणाले, 'आपल्या देशातील नागरिकांना VIP संस्कृती आवडत नाही. ही भावना किती तीव्र आहे हे मला अलिकडच्या काळात समजले. त्यामुळेच सरकारने कितीही महत्वाचा नेता असला तरीही त्याच्या गाडीवर लाल दिवा लावण्यास बंदी आणली.' 'मन की बात' या कार्यक्रमाला देशभरातील अनेक ठिकाणांवरून मोठा प्रतिसाद मिळत असल्याचे मोदी यांनी कार्यक्रमाच्या सुरूवातीला सांगितले. महाराष्ट्र आणि गुजरातच्या स्थापनादिनानिमित्त मोदी यांनी यावेळी शुभेच्छा दिल्या.
'मन की बात' कार्यक्रमात मोदी यांनी मांडलेले मुख्य मुद्दे -
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.