योगी सरकार हवे की ‘योग्य सरकार’?

अखिलेश यादव यांचा यूपीच्या नागरिकांना सवाल
योगी सरकार हवे की ‘योग्य सरकार’?
योगी सरकार हवे की ‘योग्य सरकार’?sakal media

बांदा, (उत्तर प्रदेश) : कुटुंब नसणाऱ्या व्यक्तीला सर्वसामान्यांच्या व्यथा समजू शकत नाहीत. त्यामुळे, त्यांच्याकडून लोकांची काळजी घेतली जात नाही, अशा बोचऱ्या शब्दांत समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांनी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावर आज टीका केली. तुम्हाला ‘योगी सरकार’ हवे की ‘योग्य सरकार’, असा सवालही त्यांनी जनतेला विचारला. ते समाजवादी विजय रथ यात्रेत ते बोलत होते.

भाजपच्या ‘दमदार सरकार‘ या घोषणेची खिल्ली उडवित ते म्हणाले, की भाजप ‘दमदार झूठ’ बोलत आहे. भाजपने शिक्षणमित्रांना नोकऱ्यांचे आश्वासन दिले होते. मात्र, साडेचार वर्षांनंतर पक्षाने रोजगाराच्या अपेक्षेत असणाऱ्या युवकांच्या स्वप्नांवर पाणी फेरले. आदित्यनाथ यांना लॅपटॉप वापरता येतो का, आता त्यांना स्मार्टफोनही वापरता येत नसल्याचे समजले. कारण योगी हे गोरखनाथ मंदिराचे महंत (मुख्य पुजारी) आहेत. जर त्यांना ते वापरता येत असते तर त्यांच्या सरकारने आत्तापर्यंत युवकांना लॅपटॉप, स्मार्टफोन दिला असता, अशी टीकाही त्यांनी केली.

टीईटीची प्रश्नपत्रिका फोडल्याचा आरोप

काही महिन्यांपूर्वी कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत योगी सरकारने नागरिकांना वाऱ्यावर सोडले. यशस्वी उमेदवारांना नोकऱ्या पुरवू शकत नसल्यानेच योगी सरकारने टीईटीची प्रश्नपत्रिका फोडल्याचा आरोपही अखिलेश यांनी केला. सप सत्तेवर आल्यास या उमेदवारांना नोकऱ्या दिल्या जातील,

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com