Loksabha 2019 : 'साध्वींनी शाप दिला असता तर सर्जिकल स्ट्राइकची गरज नव्हती'

Digvijay Singh
Digvijay Singh

भोपाळ : जैशे महंमद या दहशतवादी संघटनेच्या म्होरक्या मसूद अजहर याला भाजपच्या उमेदवार साध्वी प्रज्ञासिंहने शाप दिला असता तर भारताला सर्जिकल स्टाइक करायची गरज पडली नसती, असा खोचक टोला भोपाळमधील काँग्रेसचे उमेदवार दिग्विजयसिंह यांनी लगाविला आहे.

साध्वी प्रज्ञासिंह यांनी नुकतेच माझ्या शापामुळे हुतात्मा हेमंद करकरे यांचा मृत्यू झाल्याचे म्हटले होते. या विधानानंतर देशभर साध्वींच्या वक्तव्याचा निषेध करण्यात आला होता. तर, काही माजी सैनिकांनी भाजपने साध्वींची उमेदवारी रद्द करण्याची मागणी केली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांनी मात्र साध्वींच्या उमेदवारीचे समर्थन केलेले आहे. आता दिग्विजयसिंह यांनी साध्वींच्या याच वक्तव्यावरून टीका केली आहे.

दिग्विजयसिंह म्हणाले, की साध्वींनी दहशतवाद्यांचा म्होरक्या मसूद अजहरला शाप दिला असता तर भारताला सर्जिकल स्ट्राइक करायची गरज पडली नसती. आज देशात हिंदू धोक्यात असल्याचे सांगून एकत्र भडकाविले जात आहे. दहशतवादी नरकात जाऊन जरी लपले, तरीही आम्ही त्यांना शोधून काढू असे देशाचे पंतप्रधान म्हणाले होते. पुलवमा, पठाणकोट आणि उरी मधील हल्ले झाल्यावर पंतप्रधान कुठे गेले होते? भारतात नेहमीच होणारे दहशतवादी हल्ले कधी थांबतील? माझी उमेदवारी जाहीर झाल्याने माजी मुख्यमंत्री शिवराज चव्हाण घाबरले आहेत. उमा भारतींनी निवडणुकीत उतरण्यास नकार दिला. अखेर शेवटच्या दिवशी साध्वी प्रज्ञासिंह यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com