दिल्लीसह उत्तर भारत तापला; राजस्थानमधील चुरु ठरले सर्वांत उष्ण ठिकाण

Delhi
Delhi

नवी दिल्ली : देशाची राजधानी दिल्लीतील पारा आज 48 अंशांवर पोचला होता. दिल्लीतील जूनमधील विक्रमी तापमानाची आज नोंद झाली असून, दिल्लीसह उत्तर भारताला उष्णतेच्या लाटेने जोरदार तडाखा दिला. दिल्लीत पुढील दोन दिवसांसाठी "रेड अलर्ट' जारी करण्यात आल्याचेही हवामान विभागाच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. 

दिल्लीत पालम येथे आज 48 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. जून महिन्यातील दिल्लीत नोंदविण्यात आलेल्या तापमानाचा हा विक्रम आहे. 9 जून 2014 रोजी दिल्लीत 47.8 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली होती, अशी माहिती "स्कायमेट'कडून देण्यात आली. दिल्लीतील तापमान उद्या (ता. 11) काही प्रमाणात कमी होईल, त्यामुळे दिल्लीकरांना दिलासा मिळू शकतो, अशी शक्‍यता वर्तविण्यात आली; तसेच वादळी पाऊस होण्याची शक्‍यताही हवामान विभागाकडून व्यक्त करण्यात आली. 

उत्तर भारत सध्या उष्णतेच्या लाटेत होरपळत आहे. मागील आठवड्यात जगातील सर्वाधिक तापमानाची नोंद झालेल्या पहिल्या 15 ठिकाणांमध्ये भारतातील 11 ठिकाणांचा समावेश होता; तर उर्वरित चार ठिकाणे ही पाकिस्तानातील होती, असे सांगण्यात आले. जागतिक हवामान बदलांमुळे भारतातील अनेक भागांना उष्णतेच्या लाटेचा सामना करावा लागत असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.

राजस्थानमधील चुरू ठरले सर्वाधिक उष्ण ठिकाण

कडक उन्हाळ्याने होरपळत असलेल्या भारतात आज (सोमवार) पाऱ्याने अर्धशतक पार केले. राजस्थानमधील चुरुमध्ये तब्बल 50.3 अंश सेल्सियस तापमान नोंदविण्यात आले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com