नवी दिल्ली : ''नोटाबंदी पूर्णपणे अयशस्वी झाली असे सिद्ध झाले. नोटाबंदी करून सरकारने गरीब व्यक्ती, आदिवासी, महिलांना रांगेत उभे केले. यामुळे काय सिद्ध झाले? नोटाबंदीमुळे फक्त 'चौकीदारा'च्या मित्रांचे भले झाले याशिवाय कोणाचे भले झाले नाही. नोटाबंदी करुन काळापैसा परत येईल, असे सांगून मोदी सरकारने जनतेला मूर्ख बनविले'', अशा शब्दांत काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनी मोदी सरकारवर आज (शुक्रवार) निशाणा साधला.
छत्तीसगड विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यासाठी मतदान होणार आहे. त्यापूर्वी भाजप-काँग्रेससह काही स्थानिक पक्षांकडून प्रचारसभा घेतल्या जात आहेत. त्याच पार्श्वभूमीवर राहुल गांधी छत्तीसगडच्या दोन दिवसीय दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान एका प्रचारसभेत संबोधित करताना त्यांनी केंद्रातील मोदी आणि राज्यातील रमणसिंह सरकारवर टीकास्त्र सोडले. राहुल गांधी म्हणाले, छत्तीसगडमध्ये पैशांची कमी नाही. राज्यात काही वर्षांपासून भाजपची सत्ता आहे. या राज्यातील चिटफंड कंपन्या लोकांचे पैसे घेऊन पळून गेल्या आहेत. तसेच पंतप्रधान मोदींनी आपल्या काही उद्योगपती मित्रांचे 3 लाख कोटींपेक्षा अधिकचे कर्जे माफ केले. मात्र, त्यांनी शेतकऱ्यांसाठी काहीही केले नाही.
दरम्यान, नीरव मोदी, विजय मल्ल्या, मेहुल चोक्सी यांसारखी मंडळी देशातील पैसा घेऊन परदेशात फरार झाले. याशिवाय विजय मल्ल्या भारत सोडण्यापूर्वी केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांना भेटला होता, असेही ते म्हणाले.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.