

श्रीनगरः पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी काश्मीर खोऱ्यामध्ये कारवाईला वेग दिला असून आज सहा संशयित दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून जमीनदोस्त करण्यात आली. दुसरीकडे भारत- पाकिस्तान सीमेवर देखील चकमकी सुरूच आहेत. पाकिस्तानी रेंजर्सनी केलेल्या गोळीबारास भारतीय जवानांनीही जशास तसे प्रत्युत्तर दिले. सुरूवातीला हल्ल्याची जबाबदारी स्वीकारणाऱ्या ‘दि काश्मीर रेझिस्टन्स फ्रंट’ने (टीआरएफ) माघार घेत आम्ही हा हल्ला केलाच नसल्याचे म्हटले आहे.