पाकने घेतला धसका; पीओकेमधील 40 गावे स्थलांतरित, तर...

पाकने घेतला धसका; पीओकेमधील 40 गावे स्थलांतरित, तर...

श्रीनगर- पुलवामा हल्ल्यानंतर पाकिस्तानने चांगलाच धसका घेतला असून पुलवामा हल्ल्यानंतर भारताने आक्रमक भूमिका घेतली. याची धास्ती आता पाकिस्तानने घेतली आहे. पाकिस्तान व्याप्त काश्मीरमधील जवळपास 40 गावं स्थलांतरीत करण्यात आली आहेत तर जवळपास 127 गावांना हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पाकिस्तानच्या लाईन ऑफ कंट्रोल (LOC) जवळील लोकांना सतर्क राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. पाकिस्तानचा दहशतवादी मसूद अजहरला जैश-ए-मोहम्मदच्या बहावलपूर मुख्यालयातून काढून बाहेर लपवण्यात आलं आहे. पाकिस्तान सरकारने मसूद अजहरला रावलपिंडीमध्ये एका सुरक्षित स्थळी हलवलं असल्याची माहिती समोर आली आहे.

दरम्यान, पुलवामामध्ये सीआरपीएफ जवानांच्या ताफ्यावर जैश-ए-मोहमंदच्या दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात 40 जवान शहीद झाले होते. यानंतर देशामध्ये संतापाची लाट उसळली होती. पाकिस्तानला कायमचाच धडा शिकविण्याची मागणीनेही जोर धरला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com