पाकिस्तान घाबरले; भारताकडून काश्मीरमध्ये 10 हजार अतिरिक्त जवान

army
army

श्रीनगर : पुलवामा येथे झालेल्या आत्मघाती दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानची कोंडी करण्यास सुरवात केल्यानंतर आता काश्मीरमध्ये अतिरिक्त 10 हजार जवान तैनात केल्याने पाकिस्तानला धडकी भरली आहे. त्यामुळे पाकिस्ताननेही परिस्थितीवर लक्ष ठेवण्यासाठी क्रायसिस मॅनेजमेंट सेल स्थापन केले आहे.

भारत-पाकिस्तान यांच्यामध्ये सध्या तणावाचे वातावरण आहे. यापार्श्वभूमीवर पाकिस्तानची राजधानी इस्लामाबादमध्ये यासंबंधी हालचाली सुरु असून पश्चिम सीमेवरून सैन्य हटवून ते जम्मू-काश्मीरलगत पूर्व सीमेवर तैनात करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पाकिस्तानचे त्यांच्या सहकारी देशांशी जवळचे संबंध आहेत. त्यामुळे जर ताणावाची परिस्थितीवर तोडगा काढण्यासाठी तसेच उद्रेकाची स्थिती निर्माण झाल्यास त्यांची मदत घेण्यात येईल, असे पाकिस्तानच्या राजकीय सुत्रांच्या हवाल्याने एएनआयने म्हटले आहे.

पाकिस्तान लष्कराचे प्रवक्ते मेजर जनरल असिफ गफूर यांनी शुक्रवारी पत्रकार परिषद घेतली. यामध्ये ते म्हणाले, आम्ही स्वतःहून कुठलीही तयारी करीत नाही आहोत, मात्र तुम्ही युद्धासाठी तयारी करीत असाल तर त्याला उत्तर देण्याचा अधिकार आम्हाला आहे, युद्धासंबंधीचे असे सूचक विधानही त्यांनी केले होते.

भारताने काश्मीरमध्ये दहा हजार अतिरिक्त जवान तैनात केले आहेत. अनेक जवानांच्या सुट्या रद्द करण्यात आल्या आहेत. विशेष विमानाने हे सर्व जवान काश्मीरमध्ये पोहचले आहेत. पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने यावर लक्ष ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. पुलवामा येथे दहशतवाद्यांनी केलेल्या आत्मघाती हल्ल्यात 40 जवान हुतात्मा झाले होते. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com