Article 370 : व्यापारी संबंध तोडल्यानंतर पाकने घेतला आणखी एक मोठा निर्णय

Article 370 : व्यापारी संबंध तोडल्यानंतर पाकने घेतला आणखी एक मोठा निर्णय

कराची : जम्मू-काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारे कलम 370 रद्द करण्याचा भारताचा निर्णय पाकिस्तानच्या चांगलाच जिव्हारी लागला आहे. भारताबरोबर काल व्यापारी संबंध तोडल्यानंतर पाकिस्तानने आता भारत-पाकमध्ये धावणारी समझोता एक्सप्रेस बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.

पाकिस्तान दोन्ही देशांमधील राजनैतिक संबंधांचा स्तरही घटवणार आहे (ताज्या बातम्या मोबाईलवर मिळवा, 'सकाळ'चे App डाऊनलोड करा) भारतीय उच्चायुक्त अजय बिसारीया यांना पाकिस्तान सोडण्यास सांगितले असून पाकिस्तानी उच्चायुक्तही भारतात रुजू होणार नाहीत.

पाकिस्तानचा थयथयाट; भारताविरुद्ध घेतले मोठे निर्णय

पाकिस्तानचे रेल्वे मंत्री शेख रशिद अहमद यांनी हा निर्णय घेतला आहे. ज्या लोकांनी आधीच तिकीटे विकत घेतली आहेत. त्यांना त्यांचे पैसे लाहोर डीएस कार्यालयातून परत केले जातील असे सांगण्यात आले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com