...अन्यथा परिणाम भोगावे लागतील; पाकिस्तानला इशारा

...अन्यथा परिणाम भोगावे लागतील; पाकिस्तानला इशारा

नवी दिल्ली : काश्‍मीर हा भारताचा अविभाज्य घटक आहे. बांगलादेशच्या निर्मितीमुळे पाकिस्तान भारताशी बदला घेत असेल, तर भारतीय जवान पाकिस्तानचे मनसुबे कधीही यशस्वी होऊ देणार नाही, असे आज भारताचे लष्करप्रमुख बिपीन रावत यांनी पाकिस्तानला सुनावले. पाकिस्तानने छुप्या युद्धाची रणनीती सुरू ठेवली, तर भारताकडे उत्तर देण्यासाठी अनेक पर्याय आहेत आणि त्याचा वापर करू, असे रावत यांनी नमूद केले.

इन्फेंट्री दिवसानिमित्त इंडिया गेटवर अमर जवान ज्योति येथे शनिवारी हुतात्मा जवानांना श्रद्धांजली वाहण्यासाठी लष्करप्रमुख बिपीन रावत आले होते. त्या वेळी ते बोलत होते. पाकिस्तानने दहशतवाद्यांच्या घुसखोरीला प्रोत्साहन देणे थांबवावे; अन्यथा परिणाम भोगण्यास तयार राहावे, असाही इशारा रावत यांनी दिला. पाकिस्तानने आपली अर्थव्यवस्था पाहावी आणि मगच भारताशी तुलना करावी, असा सल्लाही त्यांनी दिला.

भारताविरुद्ध यश मिळू शकत नाही, हे पाकिस्तानला चांगले ठाऊक आहे. म्हणूनच काश्‍मीरच्या विकासात वारंवार अडथळे आणले जात आहेत. मात्र भारताकडे पाकिस्तानचे मनसुबे उधळून लावण्यासाठी अनेक पर्याय आहेत आणि ते अमलात आणण्यासाठी आपण सक्षम आहोत. काश्‍मीरमध्ये दगडफेक करणारे युवक हे "ओव्हर ग्राउंड वर्कर्स' आहेत. 25 ऑक्‍टोबर रोजी दगडफेकीत जवान राजेंद्र सिंह यांचा मृत्यू झाला आणि या प्रकरणी एफआयआर दाखल झाल्याची माहिती रावत यांनी दिली. सीमेलगतच्या रस्तेकामात असलेल्या जवानाला दगडफेक करणाऱ्या युवकांमुळे जीव गमवावा लागला. तरीही दगडफेक करणाऱ्यांना दहशतवाद्यांप्रमाणे वागणूक देऊ नये, असे काहींचे म्हणणे आहे, असेही रावत म्हणाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com