2025 नंतर पाकिस्तान भारतात असेल; संघ नेत्याचे वक्तव्य

Indresh Kumar
Indresh Kumar

नवी दिल्ली : पाकिस्तान हा देश 2025 नंतर भारताचा भाग झालेला असेल, असे वक्तव्य राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (आरएसएस) ज्येष्ठ नेते इंद्रेश कुमार यांनी केले आहे.

मुंबईत शनिवारी एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी हे वक्तव्य केले आहे. काश्मीर-वे अहेड या विषयावर बोलताना त्यांनी युरोपियन युनियनसारखे अखंड भारत ही संकल्पना मांडली. यामध्ये त्यांनी पाकिस्तान हा 2025 नंतर भारताचा भाग असेल असे म्हटले आहे.

इंद्रेश कुमार म्हणाले, ''1947 पूर्वी पाकिस्तान अस्तित्वात नव्हता. नागरिक म्हणतात की तो एक हिंदुस्तानचाच भाग आहे. आता 2025 नंतरही तो हिंदुस्तानचाच भाग असणार आहे. पाच ते सात वर्षांत तुम्ही पाहा तुम्हाला कराची, लाहोर, रावळपिंडी आणि सियालकोट या शहरांमध्येही घरे विकत घेता येतील आणि व्यवसाय करता येईल.''

काश्मीरमध्ये पहिल्यांदाच सरकारने प्रथमच कडक पाऊल उचलली आहेत. राजकीय इच्छाशक्ती बदलली असून, लष्करालाही कारवाईसाठी मोकळीक मिळाली आहे. त्यामुळे येथील परिस्थिती बदलेल. लाहोरमध्ये जाण्यासाठी आपल्याला मानसरोवर मार्गे तिकडे जाताना चीनची परवानगी घ्यायची गरज पडणार नाही, असेही कुमार यांनी म्हटले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com