आयएसआय भारतीय जवानांच्या जेवणात विष मिसळणार?

आयएसआय भारतीय जवानांच्या जेवणात विष मिसळणार?

नवी दिल्ली - भारताने पाकिस्तानची सगळ्याच बाजूंनी कोंडी केली आहे. भारताने केलेल्या कारवाई नंतरही पकिस्तानच्या कुरापती सुरुच आहेत. आता पाकिस्तान पुन्हा एकदा भारतीय लष्कराला नुकसान पोहोचवण्याच्या कट आखत आहे. गुतप्तचर यंत्रणांनी दिलेल्या माहितीनुसार, पाकिस्तानी मिलिट्री इंटेलिजन्स (MI) आणि इंटर सर्व्हिस इंटेलिजन्स (ISI) भारतीय लष्करांच्या जवानांविरोधात कट रचत आहे. एमआय आणि आयएसआय भारतीय लष्करातील जवानांच्या जेवणात विष मिसळण्याचा कट रचत आहेत.

गुप्तचर यंत्रणांनी यामुळे जम्मू काश्मीरमधील सुरक्षा दलांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. जेवणात विष मिसळले जाऊ शकते म्हणून अलर्ट राहण्यासही सांगितले आहे. यासोबतच जेवणाचे सामान खरेदी करताना सावधगिरी बाळगण्याचाही इशारा देण्यात आला आहे. 

पाकिस्तानी नंबरवरुन करण्यात आलेल्या चॅटच्या आधारे हा दावा करण्यात आला आहे. यानंतर गुप्तचर यंत्रणांनी सुरक्षा दलांसाठी असणाऱ्या धान्य गोदामांची सुरक्षा वाढवण्यास सांगितले आहे. याआधी अमेरिकेच्या गुप्तचर विभागाने पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादी संघटना भारतावर हल्ला करु शकते असा इशारा दिला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com