''एवढी देशभक्ती उफाळून आली की आकाशाला टेकली''

mehbooba-mufti
mehbooba-mufti

नवी दिल्ली : एयर इंडियाने विमान प्रवासादरम्यान, सर्व कॅबिन क्रू आणि कॉकपिटमधील क्रू मेंबर्सना सूचना सत्र संपल्यानंतर 'जय हिंद' म्हणण्यास सांगितले आहे. तसेच याची तत्काळ अंमलबजावणी करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत. या आदेशावर देशभक्तीच्या 'जोशाने' आता आकाशही सोडले नाही अशी टीका काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री आणि पीडीपी नेत्या मेहबुबा मुफ्ती यांनी केली आहे. 

एअर इंडियाच्या नव्या नियमावलीनुसार, प्रवासादरम्यान सर्व कर्मचाऱ्यांना विमानातील प्रत्येक जाहीर निवेदनानंतर उत्साहात जयहिंदचा नारा देणे बंधनकारक असल्याचे कंपनिने म्हटले आहे. सरकारी विमान कंपनी असणाऱ्या एअर इंडियामध्ये सध्या 3500 कॅबिन क्रू आणि 1200 कॉकपिट क्रू मेंबर्स आहेत. या सर्वांसाठी याची तत्काळ अंमलबजावणी करण्यात येणार आहे.

एअर इंडिया ही सरकारी विमान कंपनी आहे. या परिपत्रकाची माहिती कळताच मेहबुबा मुफ्ती यांनी त्यावर सडकून टीका केली. सार्वत्रिक निवडणूका जवळ आल्या असतानाच येवढी देशभक्ती उफाळून आली की आकाशाला टेकली, यामध्ये नवल काहीच नाही अशा आशयाचे ट्विट त्यांनी केले. 

मेहबुबांच्या टिकेनंतर हे पत्रक आताचे नसून यासंदर्भात पहिली सूचना २०१६मध्ये जाहीर करण्यात आली होती. त्याचा आताच्या निवडणुकांशी काही एक संबंध नाही अशी सारवासारव एअर इंडियाने केली आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com