काहींना भारताच्या सामर्थ्यावर शंका : मोदी

Narendra Modi
Narendra Modi

वाराणसी : काहींची भारताच्या सामर्थ्यावर शंका आहे. त्यांना असं वाटतंय की भारत मोठी उंची गाठू शकत नाही, त्यामुळेच आम्ही देशाची अर्थव्यवस्था पाच ट्रिलिअन डॉलरपर्यंत पोहोचवण्याचे लक्ष्य ठेवले असून, सध्या सगळीकडे याचीच चर्चा सुरु आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वाराणसी येथे सांगितले. 

देशातील पन्नास कोटी गरीबांना मोफत उपचार कसे मिळतील हेच सरकारचे लक्ष असल्याचे स्पष्ट करून नकारात्मकता सोडून सकारात्मक दृष्टिकोन ठेवण्याची गरज असल्याचा टोलाही त्यांनी देशातील विरोधकांना लगावला. 

भाजपच्या सदस्य अभियानाचे उद्‌घाटन मोदी यांच्या हस्ते झाले. येथील दादा लालबहादूर येथील दिनदयाळ उपाध्यक्ष ट्रेड केंद्रात पाच हजाराहून अधिक भाजप कार्यकर्ते उपस्थित होते. तत्पूर्वी वाराणसीतील बाबतपूर विमानतळावर माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेचे अनावरणही मोदी यांच्या हस्ते यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी लालबहादूर शास्त्री यांचे पूत्र सुनील शास्त्री, भाजपचे कार्यकारी अध्यक्ष जे. पी. नड्डा, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आदी उपस्थित होते. 

मोदी म्हणाले, की नकारात्मक लोकांपासून आपण सावध राहण्याची गरज आहे. काल सादर झालेल्या अर्थसंकल्पात आम्ही ट्रिलिअन डॉलरचे ध्येय गाठण्याच्या दृष्टीने अर्थव्यवस्थेला दिशा देण्याचे काम केले आहे. तसेच यासंदर्भातील निर्णयांची घोषणाही केली. आम्ही पुढील दहा वर्षांचे व्हिजन गाठण्यासाठी पाऊल टाकण्याचा आत्मविश्वास दाखवला. त्यानुसार, आपण पुढील पाच वर्षात नक्कीच ट्रिलिअन डॉलर अर्थव्यवस्थेचे ध्येय गाठू असा मला विश्वास आहे. 

"मी पंतप्रधान म्हणून काम करताना काही निर्णय घेतो या निर्णयाला काही लोक विरोध करतात. त्यांनी नकारात्मकता सोडली पाहिजे. माझ्यावर टीका करण्यापेक्षा चर्चा व्हायला हवी. केवळ टीका करण्यापेक्षा उपाय तरी सांगितले पाहिजेत. मी ही भाजपचा एक कार्यकर्ता आहे. त्यामुळे प्रत्येक पक्षाच्या कार्यकर्त्यांने स्वतःला कमी लेखता कामा नये. भाजपला देशात विजय मिळविला आहे त्याचे श्रेय कार्यकर्त्यांचे आहे कारण त्यांनी पक्षाची घाम गाळला आहे. अटलबिहारी वाजपेयी, लालकृष्ण अडवानी, मुरली मनोहर जोशी आदी जेष्ठ नेत्यांनी पक्षाचे अध्यक्षपद भूषविले आहे. असेही मोदी म्हणाले. 

माझ्या सरकारने गेल्या पाच वर्षात दीड कोटी गरीबांना मोफत घरे दिली आहेत. सरकार एक दिशा घेऊन काम करीत आहे. आमच्यावर टीका करायला हरकत नाही पण, दृष्टिकोन सकारात्मक हवा असा चिमटाही त्यांनी विरोधकांना काढला. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com