लखनौ : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (रविवार) गोरखपूर येथून पंतप्रधान किसान योजनेचा शुभारंभ केल्याने शेतकऱ्यांच्या खात्यावर थेट 2 हजार रुपये जमा होणार आहेत. या योजनेच्या शुभारंभावेळी मोदींनी शेतकऱ्यांना सक्षम करून त्यांचे उत्पन्न वाढविणार असल्याचे सांगितले.
गोरखपूर येथे राष्ट्रीय किसान संमेलनाच्या निमित्ताने ते उपस्थित होते. त्यावेळी एका क्लिकवर देशातील 1 कोटी 1 लाख शेतकऱ्यांच्या बँक खात्यात प्रत्येकी दोन असे एकूण 21 हजार कोटी रुपये जमा करण्यात आले. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही सर्वांत मोठी घोषणा आहे.
लोकसभा निवडणुकीपूर्वी ही योजना मोदी सरकारकडून लागू केली जाणार असल्याने शेतकऱ्यांसाठी फायद्याची ठरणार आहे. राष्ट्रीय किसान सन्मान निधी योजनेचा पहिला हफ्ता आज देण्यात आला असून, पुढील रक्कम दोन हफ्त्यात मिळणार आहे.
मोदी म्हणाले, की शेतकऱ्यांना सक्षम करण्यासाठी आम्ही निघालो आहोत. एकमेकांकडून कर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या देशात जास्त आहे. या योजनेचा फायदा शेतकऱ्यांना होणार आहे. कर्जमाफीमुळे फक्त जास्त शेती असलेल्या शेतकऱ्यांचा फायदा होतो. शेतकरी आता किसान क्रेडिट कार्डाच्या माध्यमातून 1 लाख 60 हजार रुपयांपर्यंतचे कर्ज घेऊ शकतो. शेतकऱ्यांना कर्ज मिळण्यासाठी याचा फायदा होणार आहे.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.