देशातल्या काही राज्यांमध्ये सध्या सांप्रदायिक हिंसेच्या अनेक घटना पाहायला मिळत आहे. दिल्लीतल्या जहांगीरपुरीमध्ये झालेली घटना हे एक ताजं उदाहरण सांगता येईल. याच अनुषंगाने आता पंतप्रधान नरेंद्र मोदींचं एक विधान चर्चेत आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नागरी सेवा दिवसानिमित्त दिल्लीतल्या एका सभेला संबोधित केलं. भारत आपल्या एकता आणि एकात्मतेसोबत कोणतीही तडजोड करणार नाही, असं विधान पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलं आहे. सरदार पटेल यांच्या देशाविषयीच्या महत्त्वकांक्षेची आठवण करून देताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, आम्ही एक लोकशाही राष्ट्र आहोत. सध्या आमच्यापुढे तीन आव्हानं आहेत - समानता, जागतिकीकरण आणि भारताची एकता.
आम्ही कधीही भारताच्या एकतेसोबत तडजोड करू शकत नाही. हे आमचं आणि प्रत्येक प्रशासकीय अधिकाऱ्याचं पहिलं आणि सर्वात महत्त्वाचं कर्तव्य आहे, असं पंतप्रधान मोदी म्हणाले आहेत. देशातल्या विविध राज्यांमध्ये सुरू असलेल्या सांप्रदायिक हिंसाचारादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलेलं हे विधान चर्चेचा विषय ठरत आहे. नुकतंच दिल्लीतल्या जहांगीरपुरी इथली घटना याचं ताजं उदाहरण देता येऊ शकेल.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जहांगीरपुरी घटनेवर थेट कोणतीही प्रतिक्रिया अद्याप दिलेली नाही. उत्तर दिल्लीतल्या जहांगीरपुरी भागात हनुमान जयंतीच्या दिवशी म्हणजे १६ एप्रिल रोजी दोन गटांमध्ये हिंसाचार झाला. यामध्ये ७ पोलीस अधिकाऱ्यांसह अनेकजण जखमी झाले.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.