राजकीय वाद दिल्लीदरबारी

राणांच्या तक्रारीवरून गृहमंत्रालयाची राज्याकडे विचारणा
navneet rana
navneet ranasakal

नवी दिल्ली : हनुमान चालिसावरून महाराष्ट्रात सुरू असलेला राजकीय वाद आता केंद्राच्या दरबारात पोचला आहे. अपक्ष खासदार नवनीत राणा यांना राज्य पोलिसांकडून मिळालेल्या अमानवी वागणुकीच्या तक्रारीची दखल घेऊन गृह मंत्रालयाने महाराष्ट्र सरकारकडून अहवाल मागितला आहे. खासदार राणा यांच्या तक्रारीनंतर आधारे लोकसभेच्या विशेषाधिकार समितीने गृह मंत्रालयाकडे विचारणा केली होती.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या निवासस्थानासमोर हनुमान चालिसा पठणाची घोषणा करणाऱ्या अपक्ष खासदार नवनीत राणा आणि रवी राणा या दाम्पत्याला मुंबई पोलिसांनी अटक केली असून त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल केला आहे. या अटकेदरम्यान मुंबईच्या खार पोलिसांकडून आपल्याला वाईट वागणूक मिळाल्याचा आरोप नवनीत राणा यांनी केला होता. एवढेच नव्हे तर लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांना पत्र लिहून खासदार या नात्याने मिळणाऱ्या विशेषाधिकारांचा भंग झाल्याची तक्रार केली होती.

तर, सभापतींनी हे प्रकरण संसदेच्या विशेषाधिकार आणि नितिमत्ता समितीकडे पाठविले आहे. यासोबतच, भाजपचे नेते किरिट सोमय्या यांच्यावर झालेल्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर भाजपच्या नेत्यांनी काल गृहराज्यमंत्री नित्यानंद राय, गृह सचिव अजय भल्ला यांची भेट घेऊन महाराष्ट्रातील कायदा सुव्यवस्था बिघडली असल्याची तक्रार केली होती. या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर गृह मंत्रालयाने राज्य सरकारकडे अहवाल मागविल्याचे माहिती सूत्रांनी दिली. याबाबत राज्याच्या गृह सचिवांना केंद्राला अहवाल पाठविण्यास सांगण्यात आल्याचे समजते. मात्र, हा अहवाल लोकसभेच्या विशेषाधिकार आणि नितीमत्ता समितीने विचारणा केल्यानंतर, गृह खात्याने राज्यसरकारकडून अहवाल मागविला असल्याचे सूत्रांनी स्पष्ट केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com