'स्वातंत्र्यलढ्याचा वारसा बळकावण्याचा भाजपचा प्रयत्न'

'स्वातंत्र्यलढ्याचा वारसा बळकावण्याचा भाजपचा प्रयत्न'

नवी दिल्ली - आझाद हिंद सरकारच्या 75 व्या वर्धापनदिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गांधी कुटुंबावर केलेल्या टीकेमुळे अस्वस्थ झालेल्या कॉंग्रेसने स्वातंत्र्य लढ्याचा वारसा बळकावण्याचा हा भाजपचा प्रयत्न' असल्याचा आरोप केला आहे. तसेच, नेताजी सुभाषबाबू काँग्रेसचेच नेते असल्याचा दावाही केला आहे. 

काँग्रेस प्रवक्ते अभिषेक मनू सिंघवी यांनी पंतप्रधानांच्या भाषणावर खरमरीत टीका केली. सर्वोच्च घटनात्मक पदावर असताना 24 तास आरोप-प्रत्यारोप करणे, राजकारण करणे हे पंतप्रधान नरेंद्र मोदींना शोभते काय. कधी नेताजी सुभाषचंद्र बोस यांना, तर कधी सरदार पटेलांना राजकारणात पंतप्रधान ओढतात. भाजपला स्वतःचा कोणताही वारसा नसल्यामुळे सातत्याने स्वातंत्र्यलढ्याचा वारसा बळकावण्याचे षड्‌यंत्र या पक्षाने चालविले आहे, असा आरोप सिंघवी यांनी केला. 

नेताजी सुभाषचंद्र बोस हे कॉंग्रेसचे नेते होते. त्यांनीच महात्मा गांधींना राष्ट्रपिता ही पदवी दिली होती. आझाद हिंद सेनेविरुद्ध ब्रिटिशांनी चालविलेल्या खटल्यात त्यांचा बचाव पंडित जवाहरलाल नेहरू यांनी केला होता. त्या वेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ किंवा हिंदू महासभेचे वकील आले होते काय, असा खोचक सवाल सिंघवी यांनी केला. तसेच, नेताजींनी 1938 मध्ये स्थापन केलेल्या "नॅशनल प्लॅनिंग कमिटी'च्याच आधारे पंडित नेहरूंनी "प्लॅनिंग कमिशन' (योजना आयोग) स्थापन केले होते. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी हेच प्लॅनिंग कमिशन उद्‌ध्वस्त केले, असाही आरोप कॉंग्रेस प्रवक्‍त्याने केला. तसेच, पंतप्रधानांना हा इतिहास माहिती नसेल, तर किमान त्यांच्या सल्लागारांनी तरी वस्तुनिष्ठ इतिहास जाणून घ्यावा, असा उपरोधिक सल्ला दिला. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com