Budget 2019 : पंतप्रधान मोदींनी शेतकऱ्यांचा विश्वास गमावला : काँग्रेस

Budget 2019 : पंतप्रधान मोदींनी शेतकऱ्यांचा विश्वास गमावला : काँग्रेस

अर्थसंकल्प 2019 : नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ज्या काही मोठ्या घोषणांची गरज आहे. त्यावर विचार न करता त्यांचा खोटं बोलण्याचा इतिहास आहे. त्यांनी यापूर्वीच शेतकऱ्यांचा विश्वास गमावला आहे, अशा शब्दांत काँग्रेसने ट्विटरवरून पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला. तसेच यूपीए सरकारने आताच्या सरकारच्या तुलनेत गावागावांत तीन पटीने विज पोचविण्याचे काम केले.  

2019-20 या वर्षासाठीचा अर्थसंकल्प आज संसदेत सादर केला जात आहे. या अर्थसंकल्पातील तरतूदीवरून काँग्रेसने मोदी सरकारवर टीकास्त्र सोडले. हंगामी अर्थमंत्री पीयूष गोयल यांनी अंतरिम अर्थसंकल्प जाहीर करताना त्यामध्ये त्यांनी शेतकऱ्यांना एमएसपी आणि सरकारकडून त्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा दावा केला जात आहे. जर हे सत्य असेल तर 2018 मध्ये शेतकऱ्यांनी देशव्यापीविरोध का केला? यूपीए सरकारने गावागावांत विज पोचविण्याचे काम केले. आता मोदी सरकारच्या तुलनेने हे काम तीनपटीने जास्त होते. त्यामुळे मोदी सरकारकडे उपलब्धतेच्या नावावर काहीही उरले नाही. त्यामुळे आता त्यांना खोट्याचा आधार घ्यावा लागत आहे.

तसेच संरक्षण अर्थसंकल्पाबाबतही काँग्रेसने पीयूष गोयल यांना उद्देशून ट्विट केले आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com