सातारा : कोरोनाच्या संकटामुळे यंदा संसदेचे हिवाळी अधिवेशन रद्द करण्यात आले आहे. हिवाळी अधिवेशन रद्द होण्याची घटना ही खूप वर्षांनंतर घडत आहे. संसदेचे अधिवेशन रद्द करणे म्हणजे जबाबदा-यांपासून पळ काढणे अशी टीका काॅंग्रेस ज्येष्ठ नेते आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी केली आहे.
पृथ्वीराज चव्हाण यांनी ट्विटच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र माेदी आणि केंद्र सरकारवर टीका केली आहे. आंतर संसदीय संघटनेच्या म्हणण्यानुसार, कोव्हिड साथीच्या काळात जगातील 105 हून अधिक देशांवर ऑनलाईन, शारीरिक अंतर ठेवून आणि इतर नियमांना अधीन राहून अधिवेशन झाली आहेत. भारतीय संसदेचे हिवाळी अधिवेशन रद्द करून मोदी सरकार आपल्या जबाबदा-यांपासून का पळत आहे?
Video : ग्रामपंचायत निवडणुक लढविणार आहात! सरपंच पेरे पाटलांचा संदेश वाचा
संसदेचे हिवाळी अधिवेशन रद्द तर अर्थसंकल्पीय अधिवेशन वेळेआधीच
कोरोनाच्या संकट काळात माेदी सरकराने यांना जबाबदारीने काम करण्यास हवे हाेते अशी टीका यापुर्वीही पृथ्वीराज चव्हाण यांनी केली हाेती.
According to @IPUparliament data more than 105 countries across the world held multiple Parliamentary sessions amidst the Covid-19 pandemic. Why Modi Govt is evading the accountability by canceling #ParliamentSession?
— Prithviraj Chavan (@prithvrj) December 15, 2020
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.