उत्तर प्रदेशात गुन्हेगार मोकाट; प्रियांका गांधींचे ट्विट

Crime
Crime

लखनौ : उत्तर प्रदेशमध्ये गुन्हेगार मोकाट सुटले असून, एकामागून एक गुन्हे घडत असल्याचा आरोप कॉंग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांनी केला. राज्यात कायदा आणि सुव्यवस्था नावालाही राहिली नसून गुन्ह्याचे प्रमाण वाढत असताना भाजप सरकार काहीच हालचाल करत नाही. उत्तर प्रदेश सरकारने गुन्हेगारांसमोर लोटांगण घातले की काय, असा सवालही प्रियांका यांनी ट्विट करत केला. मात्र पोलिसांनी राज्यातील गुन्ह्यांत घट झाल्याचा दावा केला आहे. 

प्रियांका गांधी यांनी आपल्या ट्विटमध्ये उत्तर प्रदेशातील घटनांची कात्रणे जोडली आहेत. बदायूँतील बंदुकीचा धाक, अमेठीतील गोळीबार, उन्नावमधील तुरुंगात कैद्यांकडून बंदुका दाखवणे यांसारख्या 15 घटनांचा उल्लेख केला आहे. यापूर्वीही समाजवादी पक्षाने राज्यातील कायदा-सुव्यवस्थेवरून योगी आदित्यनाथ सरकारला घेरले होते.

दरम्यान, प्रियांका गांधी यांच्या ट्विटला उत्तर प्रदेश पोलिसांनी उत्तर दिले आहे. त्यात म्हटले आहे, की गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यांतील आरोपीविरुद्ध कठोर कारवाई केली जात आहे. गेल्या दोन वर्षांत 9 हजार 225 गुन्हेगारांच्या मुसक्‍या आवळल्या असून, 81 जण मारले गेले आहेत. राष्ट्रीय सुरक्षा कायद्याखाली सुमारे 2 अब्ज मालमत्ता जप्त केली असून दरोडा, खून, अपहरण, खंडणी यांसारख्या घटनांत घट झाल्याचा दावा उत्तर प्रदेश पोलिसांनी केला आहे. 

उत्तर प्रदेशात भाजपचे सरकार आल्यानंतर गुन्हेगारांचे नेटवर्क मोडून काढले आहे. दोषींविरुद्ध सरकार कडक कारवाई करत आहे. काही घटना वैयक्तिक कारणावरून होत आहेत आणि याप्रकरणी पोलिस तातडीने कारवाई करत आहेत. 
- ब्रजेश पाठक, कायदामंत्री, उत्तर प्रदेश

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com