यापुढे हिंसाचार करणाऱ्यांची मालमत्ता जप्त होणार!

Public-Property
Public-Property

बंगळूर : नागरिकत्व दुरुस्ती कायद्याच्या निषेधार्थ आंदोलनाच्या काळात सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करणाऱ्या आंदोलकांची मिळकत जप्त करण्यात येणार असल्याची माहिती पर्यटन खात्याचे मंत्री सी. टी. रवी यांनी दिली. उत्तर प्रदेशात असा कायदा अस्तित्वात असून, त्याचे अनुकरण कर्नाटकातही करण्यात येणार असल्याचे ते म्हणाले. 

मंगळुरात पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, "लोकशाही व्यवस्थेत हिंसाचाराला वाव नाही. संसदेत तोंडी तलाक विधेयक मंजूर झाल्यानंतर देशात आंदोलन पेटेल, अशी कॉंग्रेसची अपेक्षा होती. घटनेतील 370वे कलम रद्द केल्यानंतरही रक्तपात होईल, असा त्यांचा विचार होता.

अयोध्या निकालानंतरही देशात मोठा गोंधळ होईल, अशी त्यांची अपेक्षा होती. परंतु, त्यांच्या अपेक्षेप्रमाणे काहीही घडले नाही. त्यामुळे कॉंग्रेसने आता नागरिकत्व दुरुस्ती विधेयकाच्या निमित्ताने देशात आंदोलनाला चिथावणी देण्याचा प्रयत्न सुरू केला आहे.' 

बंगळुरात झालेल्या दंगलीला कोणत्याच प्रकारची सवलत देण्यात येणार नाही. जप्त करण्यात येणारी मालमत्ता नुकसानभरपाईसाठी वापरण्यात येणार आहे. मंगळूर दंगलीवर राज्य सरकारने योग्य प्रकारे नियंत्रण आणले. पोलिसांनीसुद्धा योग्यप्रकारे कारवाई करून आंदोलन वेळीच शांत केल्याचे ते म्हणाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com