6 वेळा सोडलेल्या हल्लेखोरामुळेच 40 जवानांना वीरमरण!

6 वेळा सोडलेल्या हल्लेखोरामुळेच 40 जवानांना वीरमरण!

श्रीनगर- जम्मू्-काश्मीरमधील पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यातील आत्मघाती हल्लेखोर आदिल अहमद दार याला 6 वेळा चौकशी करुन सोडले होती अशी माहिती समोर आली आहे. तब्बल सहावेळा चौकशीसाठी ताब्यात घेऊन त्याला सोडून दिले असल्याची माहिती मिळाली आहे.

आदिल हा पुलवामा जिल्ह्यातील रहिवासी आहे. सप्टेंबर 2016 ते मार्च 2018 या काळात त्याला सहा वेळा चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले होते. आदिलला सुरक्षा दलाने दगडफेक प्रकरणी ताब्यात घेतले होते. पण सबळ पुराव्या अभावी त्याला सोडून देण्यात आले होते. केवळ 20 वर्षाच्या आदिलने एक वर्षापूर्वी जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेत सहभागी झाला होता. एक वर्षभरापूर्वी तो भाऊ दरासह मित्रांना भेटण्यासाठी जातो म्हणून घरातून बाहेर पडला होता. त्यानंतर ते परत आलाच नाही. आदिल बेपत्ता असल्याची माहिती पोलिसांना देण्यात आली होती.

पुलवामामधील अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार आदिल 2016पासून लष्कर-ए-तोयब्बासाठी काम करत होता. जम्मू-काश्मीरमधील दहशतवाद्यांना मदत आणि त्यांना सुरक्षा पुरवण्याचे काम आदिल करत होता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com