'मतांसाठीच पुलवामा हल्ला घडविण्यात आला'

'मतांसाठीच पुलवामा हल्ला घडविण्यात आला'

नवी दिल्ली : पुलवामा येथे 14 फेब्रुवारी रोजी आत्मघाती हल्ला घडविण्यात आला. यामध्ये 40 हून अधिक जवान हुतात्मा झाले. या हल्ल्यानंतर आता समाजवादी पक्षाचे नेते राम गोपाल यादव यांनी एक वादग्रस्त वक्तव्य केले. ''पुलवामा दहशतवादी हल्ला हा मतांसाठी घडविण्यात आला होता. यामध्ये आपले जवानांना मतांसाठी मारण्यात आले'', असे यादव म्हणाले.

राम गोपाल यादव हे समाजवादी पक्षाचे सरचिटणीस आहेत. यादव यांनी एका कार्यक्रमात हे वक्तव्य केले. ते म्हणाले, "निमलष्करी दल सरकारवर नाराज आहे. मतांसाठी जवानांना मारण्यात आले. जम्मू-श्रीनगर दरम्यान तपासणी झाली नाही. सामान्य बसमधून त्यांना पाठविण्यात आले. हे एकप्रकारचे षड्यंत्र होते. आता जेव्हा सरकार बदलेल तेव्हा या प्रकरणाचा तपास केला जाईल. याप्रकरणात मोठ-मोठे लोक अडकण्याची शक्यता आहे''.

दरम्यान, राम गोपाल यादव हे समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांच्या निकटवर्तीयांपैकी एक समजले जातात. त्यांनी पुलवामा हल्ल्याबाबत हे वक्तव्य केले आहे. यापूर्वी काँग्रेस नेते बी. के. हरिप्रसाद यांनी पुलवामा हल्ल्याबाबत वादग्रस्त वक्तव्य केले होते, की पंतप्रधान मोदी आणि पाकचे पंतप्रधान इम्रान खान यांच्या सहभागातून हा हल्ला झाल्याचे त्यांनी वक्तव्य केले होते.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com