नवी दिल्ली : कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा इशारा देणाऱ्या काँग्रेस नेते राहुल गांधींनी केंद्र सरकारला डेल्टा प्लस व्हेरिएंटच्या मुकाबल्यासाठी नेमकी काय रणनीती आखली? असा सवाल केला आहे. ‘डेल्टा प्लस व्हेरिएंटवरून मोदी सरकारला काही प्रश्न’ अशा आशयाचे ट्विट करून राहुल गांधींनी चाचणी, लस आणि रणनीती यावरून सरकारला काही सवाल केले आहेत. डेल्टा प्लस व्हेरिएंटची तपासणी आणि प्रतिबंधासाठी व्यापक प्रमाणात चाचण्या का केल्या जात नाहीत? यावर लस किती परिणामकारक आहे? आणि याची पूर्ण माहिती कधी मिळेल? तिसऱ्या लाटेमध्ये यावर नियंत्रणासाठी सरकारकडे कोणती योजना आहे?
अशा प्रश्नांच्या फैरी राहुल यांनी झाडल्या आहेत. कोरोना विषाणूच्या डेल्टा प्लस व्हेरिएंटबद्दल केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने अलीकडेच गंभीर चिंता व्यक्त केली होती. महाराष्ट्र, केरळ, मध्यप्रदेश आणि तमिळनाडूमध्ये या व्हेरिएंटचा शिरकाव झाल्याचे बोलले जाते. त्यापार्श्वभूमीवर राहुल गांधींनी हे प्रश्न उपस्थित केले आहेत.
श्वेतपत्रिकेची मागणी केली होती
दोन दिवसांपूर्वी राहुल गांधींनी कोरोना व्यवस्थापनावर श्वेतपत्रिका प्रसिद्ध करून त्यातील त्रुटींवर बोट ठेवले होते. तसेच श्वेतपत्रिकेतील सूचनांचा सरकारला कोरोना
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.