
राहुल गांधी यांनी काल सायंकाळी तमिळनाडूतील एका कार्यक्रमात भाजपासह राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर देखील निशाणा साधला आहे.
तमिळनाडू : विधानसभा निवडणुकीच्या आधी दक्षिणेतील तमिळनाडू राज्यात राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. पोंगल सणानंतर राहुल गांधी पुन्हा एककदा तमिळनाडूच्या दोन दिवसाच्या दौऱ्यावर होते. राहुल गांधी यांनी या दोन दिवसीय दौऱ्यामध्ये केंद्र सरकारला चांगलंच धारेवर धरलं आहे. आपल्या या दोन दिवसीय दौऱ्याचा शेवट देखील राहुल गांधी यांनी अगदी तिखट शब्दात केला आहे. राहुल गांधी यांनी काल सायंकाळी तमिळनाडूतील एका कार्यक्रमात भाजपासह राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर देखील निशाणा साधला आहे.
#WATCH | We'll not allow Narendra Modi to destroy the foundation of India...He doesn't understand that only Tamil people can decide the future of Tamil Nadu. 'Knickerwallahs' from Nagpur can never ever decide future of the state: Congress' Rahul Gandhi in Dharapuram, Tamil Nadu pic.twitter.com/KFDaXKeTMG
— ANI (@ANI) January 24, 2021
धारापुरमध्ये काल रविवारी राहुल गांधी यांनी आपल्या भाषणात म्हटलं की, नागपुरचा 'निकरवाला' कधीच तमिळनाडूचं भविष्य ठरवू शकत नाही. तमिळनाडूचे भविष्य इथले युवक ठरवतील. आणि मी त्यांच्या मदतीसाठी आलो आहे. पुढे राहुल गांधी यांनी म्हटलं की, तमिळनाडूत असं सरकार हवं आहे, जे लोकांसाठी काम करेल आणि तमिळ लोकांच्या हितासाठी काम करेल, आम्ही नरेंद्र मोदींना भारताचा पाया उद्ध्वस्त करु देणार नाही.
याआधी त्यांनी इरोडमध्ये विणकर लोकांशी संवाद साधला होता. त्यावेळी त्यांनी म्हटलं होतं की, जर भारतातील कामगार, शेतकरी आणि विणकर मजबूत असते, सुरक्षित असते आणि त्यांना संधी मिळाली असती तर चीनने कधीच भारतात घुसण्याची हिंमत केली नसती. यावेळी राहुल गांधी यांनी शेतकरी आंदोलनाचं समर्थन करत म्हटलं की, शेतकऱ्यांच्या अडचणी ऐकण्याऐवजी, त्या समजून घेण्याऐवजी हे सरकार त्यांना दहशतवादी ठरवत आहे. या साऱ्या शक्तीशी आपण सर्वजण मिळून लढू. याआधी त्यांनी ट्विट करुन महागाईच्या मुद्यावर मोदी सरकारवर हल्ला केला होता.
हेही वाचा - ..तर घुसखोरी करायची चीनची हिंमत नसती; राहुल गांधी यांचा मोदी सरकारवर घणाघात
यावर्षीच विधानसभेची रणधुमाळी
राहुल गांधी 23 जानेवारी रोजी तमिळनाडूच्या दौऱ्यावर गेले होते. ते तिथे तीन दिवसाच्या दौऱ्यावर आहेत. तमिळनाडूत यावर्षीच विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. असातच राहुल गांधी पक्षाच्या प्रचारात व्यस्त आहेत. दक्षिणेत आपलं वर्चस्व प्रस्थापित करण्याचे भाजपचे प्रयत्न आहेत. त्या दृष्टीने भाजप मोर्चेबांधणी करत आहे.