राहुलजी आपण नेहमी भेटले पाहिजे- नरेंद्र मोदी

rahul gandhi-narendra modi
rahul gandhi-narendra modi

नवी दिल्ली- शेतकऱयाच्या कर्जमाफीबाबत चर्चा करण्यासाठी काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज (शुक्रवार) भेट घेतली. यावेळी राहुलजी आपण नेहमी भेटले पाहिजे, असे मोदी म्हणाले.

राहुल गांधी व यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेत निवेदन दिले. शेतकऱ्यांचे कर्ज माफ करण्यात यावे. शेतकऱयांच्या पिकांना योग्य दर देण्यात यावा. शिवाय, नोटाबंदीच्या निर्णयानंतर जमा झालेली रक्कम कर्जमाफीसाठी वापरण्यात यावी, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

पत्रकारांशी बोलताना गांधी म्हणाले, 'आम्ही शेतकऱयांचे कर्ज माफ करण्याची मागणी पंतप्रधानांकडे केली आहे. पंतप्रधानांनीही शेतकऱयांची स्थिती गंभीर असल्याचे मान्य केले आहे. परंतु, कर्जमाफीसंदर्भात ते काही बोलले नाहीत. त्यांनी फक्त ऐकून घेतले आहे.'

दरम्यान, नरेंद्र मोदींविरोधात आपल्याकडे भ्रष्टाचाराचे पुरावे आहेत, असा गौप्यस्फोट गांधी यांनी नुकताच केला होता. परंतु, आजच्या भेटीदरम्यान दोन्ही नेत्यांमध्ये मैत्रीपुर्ण वातावरण होते. यावेळी राहुलजी आपण नेहमी भेटले पाहिजे, असे मोदी म्हणाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com