अमृतसर रेल्वे घटनेची चौकशी रेल्वे करणार 

अमृतसर रेल्वे घटनेची चौकशी रेल्वे करणार 

अमृतसर : अमृतसर रेल्वे दुर्घटनेप्रकरणी सुरवातीला हात झटकणाऱ्या रेल्वेने आता चौकशीची तयारी दर्शविली आहे. रावणदहनाच्या वेळी घडलेल्या दुर्घटनेची चौकशी रेल्वेच्या सुरक्षा विभागाचे मुख्य आयुक्त करणार असल्याचे सांगण्यात आले.

अमृतसर येथे विजयादशमीच्या दिवशी रेल्वेरुळालगत उभा राहून रावणदहन पाहणाऱ्या नागरिकांना चिरडल्याने सुमारे 60 जण मृत्युमुखी पडले होते. या घटनेनंतर याप्रकरणी कोणताही दोष नसल्याचे रेल्वेमंत्रालयाने प्रारंभी म्हटले होते. तसेच कोणत्याही प्रकारची चौकशी केली जाणार नसल्याचे सांगण्यात आले होते. मात्र आता रेल्वेने काढलेल्या एका अधिसूचनेनुसार या घटनेची चौकशी रविवार (ता. 4) पासून सुरू होणार आहे. रेल्वेच्या सुरक्षा विभागाचे मुख्य आयुक्त शैलेश पाठक यांनी याबाबत जबाब घेण्यासाठी अपघाताशी निगडीत लोकांना पाचारण केले आहे. अमृतसर येथील रेल्वे मॅकनिकल वर्कशॉपमध्ये नागरिक शैलेश पाठक यांच्यासमोर जबाब नोंदवतील.

तसेच ही चौकशी पाच नोव्हेंबरपर्यंत चालणार आहे. याशिवाय लखनौचे मुख्य रेल्वे सुरक्षा आयुक्तांना देखील याप्रकरणी चौकशी करण्याचे निर्देश दिले. अपघाताला जबाबदार असणाऱ्या घटकाचा तपास करण्यास सांगितले आहे. तसेच प्राथमिक तपासात या घटनेला चालक जबाबदार नसल्याचेही अधिसूचनेत म्हटले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com