राजस्थान (Rajsthan) विधानसभेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे. बुधवारी अधिवेशनात चर्चेदरम्यान अशोक गेहलोत यांच्या सरकारमधील एका मंत्र्यांनी वादग्रस्त विधान केल्याने तेथे चर्चेला उधान आले. मंत्री शांती धारिवाल (SK Dhariwal) यांनी विधानसभेत बोलताना राजस्थान राज्य बलात्काराच्या बाबतील देशात पहिल्या स्थानावर असल्याचे सांगितले. याबाबतचे कारण सांगताना राजस्थान हा मर्दांचा प्रदेश असल्याने इथे जास्त बलात्कार होत असल्याचे धक्कादायक वक्तव्य त्यांनी केले आणि असे म्हणताना धारीवाल चक्क हसत होते आणि त्यांच्यासोबत अनेक मंत्री आणि काँग्रेसचे नेतेही हसू लागले.
या सर्व प्रकरणाने राजस्थानमधील राजकीय वातावरण चांगलेच तापले. या प्रकरणावर आता मंत्री शांती धारिवाल यांनी प्रतिक्रिया दिली.
या वक्तव्यानंतर मोठ्या प्रमाणावर त्यांच्यावर टीका होऊ लागल्याने त्यांनी यावर स्पष्टीकरण दिले. शांती धारिवाल या संदर्भात बोलताना म्हणाले की, “मी नेहमीच महिलांचा आदर केला आहे आणि त्यांना प्रत्येक गोष्टीत सहभागी होण्यासाठी प्रोत्साहित केले. विधानसभेमध्ये बोलताना माझी जीभ घसरली. मला, ‘इस प्रदेश में ये मरज़ कहां से आ गया’ असे म्हणायचे होते, परंतु चुकून ‘ये मर्दों का प्रदेश है’, असे तोंडातून बाहेर पडले. मी सभागृहाची माफी मागतो.”
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.