‘...तर भारत कठोर पावले उचलण्यास मागेपुढे पाहणार नाही’

Rajnath Singh
Rajnath SinghRajnath Singh

सीमेपलीकडून (border) होणाऱ्या हल्ल्यांविरोधात भारत कठोर पावले उचलण्यास मागेपुढे पाहणार नाही. दहशतवादाशी कठोरपणे सामना केला जाईल. बांगलादेशातून होणारी घुसखोरी जवळपास थांबली आहे. देशाच्या पूर्व सीमेवर शांतता आणि स्थिरता आहे, असं म्हणत सीमेपलीकडील दहशतवादाबाबत संरक्षण मंत्री राजनाथ सिंह (Rajnath Singh) यांनी पाकिस्तानला पुन्हा एकदा कडक इशारा दिला आहे.

राजनाथ सिंह यांनी हा संदेश अशावेळी दिला आहे, जेव्हा एक दिवसापूर्वी जम्मूतील सुजवानमध्ये दहशतवादाचा मोठा कट उधळून लावला गेला आहे. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी रविवारी (ता. २४) जम्मू दौऱ्यावर जाणार आहेत. गुवाहाटी येथील श्रीमंत शंकरदेव कलाक्षेत्र पुरस्कार सोहळ्याला संरक्षण मंत्री उपस्थित होते. आसाम सरकारने १९७१ च्या युद्धात सर्वोच्च बलिदान दिलेल्या शहिदांच्या स्मरणार्थ या सोहळ्याचे आयोजन केले आहे. हुतात्म्यांनी बांगलादेश मुक्तिसंग्रामात भाग घेतला होता.

Rajnath Singh
नवरदेव व सख्या भावासह मित्राचा मृत्यू; विसपुते कुटुंबावर काळाचा घाला

सरकार भारतातून दहशतवाद (border) नष्ट करण्याच्या मोहिमेत गुंतले आहे. भारत आपल्या भूमीवर हल्ला झाल्यास कठोर प्रत्युत्तर देण्यास तयार असल्याचे दाखवून दिले आहे. भारत जो तणाव पश्चिम सीमेवर हाताळत आहे तो पूर्व सीमेवर नाही. कारण, बांगलादेश हा मित्र देश आहे, असे राजनाथ सिंह (Rajnath Singh) म्हणाले.

AFSPA प्रभावी होण्यासाठी परिस्थिती जबाबदार

अलीकडेच ईशान्येकडील विविध भागातून AFSPA हटवण्यात आल्यावर राजनाथ म्हणाले, सरकार परिस्थिती सुधारण्यासाठी योग्य पावले उचलत आहे. AFSPA कायमस्वरूपी लागू व्हावा असे लष्कराला वाटते हा भ्रम आहे. AFSPA प्रभावी होण्यासाठी परिस्थिती जबाबदार आहे, लष्कर नाही, असेही राजनाथ सिंह (Rajnath Singh) म्हणाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com