भारत-पाक सीमेवरील नागरिकांनाही आरक्षण; केंद्राचा महत्त्वपूर्ण निर्णय

भारत-पाक सीमेवरील नागरिकांनाही आरक्षण; केंद्राचा महत्त्वपूर्ण निर्णय

नवी दिल्ली : जम्मू-काश्मीरबाबत केंद्र सरकारकडून दोन महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. यामध्ये भारत-पाकिस्तान सीमेवरील नागरिकांनाही आरक्षणाचा लाभ मिळणार आहे. तसेच या परिसरात असलेले कलम 370 जवळपास शिथिल करण्याच्या मार्गावर आहे, असे केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी आज (गुरुवार) सांगितले. 

अरुण जेटली यांनी पत्रकार परिषद घेऊन ही माहिती दिली. ते म्हणाले, इतर राज्यातील नागरिकांना आरक्षणाचा लाभ मिळत आहे. मात्र, आता जम्मू-काश्मीरातील नागरिकांनाही त्यांच्याप्रमाणेच आरक्षणाचा फायदा होणार आहे. यामध्ये मागासवर्ग, ओबीसी आणि सवर्ण समाजातील नागरिकांना याचा लाभ घेता येईल. तसेच 1954 मध्ये राष्ट्रपती असलेल्या राष्ट्रपती आदेशातही बदल केला जाणार आहे.  

दरम्यान, केंद्र सरकारने घेतलेल्या या निर्णयाचा फायदा जम्मू-काश्मीरातील नागरिकांना होणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com