...तर मनोबल तोडण्यासाठी मंदिरे उद्ध्वस्त केली गेली : मोहन भागवत

मंदिरात त्यावेळी काय नव्हते? अध्यात्म तर होतेच, पूजाही केली जात होती.
डॉ. मोहन भागवत
डॉ. मोहन भागवत

खतौली (उत्तर प्रदेश) : मंदिरात त्यावेळी काय नव्हते? अध्यात्म तर होतेच, पूजाही केली जात होती. त्यामुळे लोकांचे जीवन चांगले व्हावे आणि हळूहळू ते सत्याकडे मार्गक्रमण करावे. हे सर्व मंदिरांमध्ये होत होते, असे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत (Mohan Bhagwat) यांनी सांगितले. उत्तर प्रदेशातील खतौली येथील शिव मंदिर स्थापना दिनानिमित्त आज बुधवारी (ता.१५) आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. (RRS Chief Mohan Bhagwat Says, Temples Destroyed For Demoralize Peoples Will)

डॉ. मोहन भागवत
जे सरकार सामान्य माणसांची दखल घेत नाही, ते जागेवर राहत नाही : फडणवीस

त्यावेळी मंदिरांमध्ये विविध प्रकारचे रोजगारही मिळत होते. मंदिरांमध्ये शाळा चालवल्या जात होत्या. मंदिर सर्व समाज जीवनाचे श्रद्धेचे केंद्र होते. त्यामुळे विदेशी हल्लेखोरांनी मंदिरांना लुटून उद्ध्वस्त केले, असे भागवत म्हणाले. जेव्हा आपल्याला गुलान बनवायचे होते तेव्हा मंदिरांना उद्ध्वस्त केले गेले.

डॉ. मोहन भागवत
राष्ट्रपती निवडणुकीसाठी सर्व विरोधी पक्ष एकवटले, दिग्गज नेत्यांची हजेरी

ती केवळ संपत्तीसाठी नव्हे तर मनोबल तोडण्यासाठीही मंदिरे उद्ध्वस्त केली गेली, असे संघ (RRS) प्रमुख मोहन भागवत यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com