नवी दिल्ली- राफेल विमान खरेदी व्यवहार प्रकरणावरून काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी सातत्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करत आहेत. आता त्यांनी रिलायंससारख्या अकुशल आणि या क्षेत्रातील कंपन्यांना कंत्राट मिळवून देणे हीच कुशल भारताची ओळख असल्याची खरमरीत टीका मोदींवर केली आहे.
हिंदुस्तान एअरोनॉटिक्स लि. (एचएएल) कडून 30 हजार कोटी रुपयांचे कंत्राट काढून ते एका 'अकुशल' त्या क्षेत्रातील काहीच अनुभव नसणाऱ्या रिलायंस कंपनीला देणे हाच पंतप्रधानांचा 'स्कील इंडिया'चा कार्यक्रम असल्याचा टोला त्यांनी ट्विटरवरून लगावला आहे.
देशातील कोट्यावधी कुशल युवक बेरोजगारीचा सामना करत आहेत. देशातले युवकांनी मागील 20 वर्षात एवढी मोठी बेरोजगारी कधीच बघितली नव्हती असेही राहुल यांनी स्पष्ट केले आहे. भारतातील बेरोजगारीचा दर मागील वीस वर्षात सर्वात जास्त वाढला असल्याचा दावादेखील राहुल गांधी यांनी आपल्या ट्विटमध्ये केला आहे.
दरम्यान, मोदी सरकारने फ्रान्सची कंपनी डेसॉल्टकडून राफेल विमान खरेदी करण्याचा व्यवहार केला आहे. त्याचे मूल्य तत्कालीन यूपीए सरकारने ठरवलेल्या रकमेपेक्षा जास्त असल्याचा दावा राहुल गांधी आणि काँग्रेसकडून गेल्या अनेक महिन्यांपासून केला जात आहे. या व्यवहारामुळे सरकारी खजिन्यातील हजारो कोटी रूपयांचे नुकसान करुन जाणीवपूर्वक काही हेतू सांभाळण्यासाठी मोदींनी व्यवहारात बदल करत हे कंत्राट रिलायंसला दिले असल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. या व्यवहारात मोठा भ्रष्टाचार झाला असल्याचा आरोपही काँग्रेसकडून करण्यात आला आहे.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.