नवी दिल्ली : ‘जय श्रीराम’च्या घोषणाबाजीने भागणार नाही तर आपले आचरणही प्रभू रामासारखे असायला हवे , अशा कानपिचक्या सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी दिल्या आहेत.दिल्लीच्या विज्ञान भवनात झालेल्या संत ईश्वर सन्मान कार्यक्रमात भागवत यांच्या भाषणादरम्यान काही जणांनी ‘जय श्रीराम’च्या घोषणा देण्यास सुरवात कली. त्यांना तत्काळ थांबवत भागवत म्हणाले, की केवळ घोषणांनी चालणार नाही, तर आपले आचरणही प्रभू श्रीरामासारखे असेल असे प्रयत्न प्रत्येकाने करायला हवेत. त्यामुळे जनतेची निःस्वार्थ सेवा करण्याचे सामर्थ्य प्राप्त होईल.
स्वातंत्र्याच्या ७५ वर्षांनंतर देशाचा अपेक्षेप्रमाणे विकास झाला नसल्याची खंत व्यक्त करून भागवत म्हणाले, की सेवेत ‘जोश'' नसून ‘होश'' असणे आवश्यक आहे. जनसेवेत अहंकाराला थारा नाही, असेही सरसंघचालकांनी सूचकपणे सांगितले.
१३० कोटी लोकसंख्येच्या भारतातील नागरिक प्राचीन काळापासून येथील जमीन व देश यांना आपले मानतात. त्यामुळेच विविधतेने नटलेला हा देश एकसंध आहे. मात्र देशाने विकासाच्या प्रगतिपथावर मार्गस्थ होण्याचे काम गेल्या ७५ वर्षांत केले नाही, असेही ते म्हणाले.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.