संस्कृत न शिकल्याची आंबेडकरांना होती खंत : मोहन भागवत

Mohan Bhagwat
Mohan Bhagwat

नागपूर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनीही संस्कृत भाषेचे महत्त्व स्पष्ट केले होते. तसेच त्यांना संस्कृत भाषा न शिकल्याची खंत होती, असे वक्तव्य राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी केले आहे.

नागपूरमध्ये कवी कुलगुरू कालिदास संस्कृत महाविद्यालयात बोलताना भागवत यांनी संस्कृत भाषेबद्दलचे महत्त्व सांगितले. 

भागवत म्हणाले, की भारतातील प्रत्येक भाषेत 30 टक्के संस्कृत शब्द आहेत. संस्कृत ही एक ज्ञानभाषा आहे. खगोल, वनस्पती, कृषीशास्त्र या शास्त्रातील भारतातील ज्ञान संस्कृतमध्ये आहे. इंग्रजी भाषा पूर्णपणे संस्कृतचे भाषांतरण करू शकत नाही. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनीही संस्कृत भाषेचे महत्त्व स्पष्ट केले होते. शास्त्रज्ञ उपनिषधांचा अभ्यास करू लागले आहेत. विदेशातील अनेक विद्यार्थी संस्कृतचा अभ्यास करीत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com