संजय राऊतांनीच ईव्हीएमवर केला प्रश्न; मंत्र्यांनी दिले 'हे' उत्तर

संजय राऊतांनीच ईव्हीएमवर केला प्रश्न; मंत्र्यांनी दिले 'हे' उत्तर

नवी दिल्ली - भारतीय जनता पक्षाचे मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी ईव्हीएमसंदर्भात आज (ता.27) राज्यसभेत प्रश्न उपस्थित केला होता. महाराष्ट्रातील काही भागात झालेल्या मतदान तफावतींच्या तक्रारी निवडणूक आयोगाकडे करण्यात आल्या आहेत. या तक्रारींचे काय होते, याबाबत कारवाई होणार का? असा प्रश्न संजय राऊत यांनी उपस्थित केला होता.

संजय राऊत यांच्या या प्रश्नावर कायदामंत्री रविशंकर प्रसाद यांनी उत्तर दिले. रविशंकर प्रसाद म्हणाले की, व्हीव्हीपॅटसंदर्भात अशी कुठलीही तक्रार आली नसल्याचे निवडणूक आयोगाने म्हटले आहे. तसेच, मतदान प्रक्रियेवेळी निवडणूक आयोगाचे अधिकारी, उमेदवार आणि त्यांचे प्रतिनीधीही हजर असतात. त्यामुळे, तशी कुठलीही तक्रार नसून संबंधित प्रकाराबाबत विशेष तक्रार आल्यास नक्कीच याबाबत माहिती घेण्यात येईल, असे रविशंकर प्रसाद यांनी म्हटले. 

दरम्यान, राज्यसभेत प्रश्न उपस्थित करत असाताना संजय राऊत म्हणाले की, महाराष्ट्रातील काही भागांत मतदान हे कमी-जास्त झाल्याची तक्रार आहे. कालच, मला वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर भेटले होते, याबाबत त्यांनी प्रश्न उपस्थित केला होता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com