पृथ्वीराज चव्हाण म्हणतात म्हणून सरहद्दीवर जाऊन चीनचे नाव घ्यायला पंतप्रधान घाबरताहेत

पृथ्वीराज चव्हाण म्हणतात म्हणून सरहद्दीवर जाऊन चीनचे नाव घ्यायला पंतप्रधान घाबरताहेत

कऱ्हाड : अर्थव्यवस्थेला शेतकरी राजा वाचवु शकेल. देशात फक्त कृषी अर्थव्यवस्था स्वबळावर शेतकऱ्यांनी सुरु ठेवली आहे. त्या शेतकऱ्यांच्या मानगुटीवर पाय देण्याचे काम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सरकार करत आहे, असा आरोप माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आज केला. जागतीक बाजारपेठेत कच्या तेलाचे दर गडगडले असतानाही त्याचा फायदा नागरीकांना देण्याऐवजी पंतप्रधान मोदी सरकराने अर्थव्यवस्थेतील तुट भरुन काढण्यासाठी डिझेल-पेट्रोलची दरवाढ केली आहे, असा आरोपही त्यांनी केला.
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा 

काँग्रेसने केलेल्या आंदोलनानंतर पत्रकाऱांशी आमदार श्री. चव्हाण बोलत होते. केंद्र सरकाराने 820 टक्क्यांनी डिझेलवर वाढ केली आहे, असे सांगूण ते म्हणाले, डिझेल-पेट्रोलचे दर वाढवल्याने सहा वर्षात पंतप्रधान मोदी सरकारने कर वाढवुन 18 लाख कोटी रुपये मिळवले आहेत. डिझेलची दरवाढ केल्याने दैनंदिन गरजेच्या वस्तुंची दरवाढ झाली आहे. तेलाचे दर कमी करुन सामान्यांना दिलासा देणे आवश्यक होते. मात्र त्यांनी भाववाढ करुन आर्थिक तुट भरुन काढण्याचे काम सुरु केले आहे. लॉकडाऊनबाबत मोदी सरकारमध्ये सध्या संभ्रम निर्माण झाला आहे. दैनंदिन गरजेच्या वस्तु सुरु होणार आहेत की नाही याबाबत स्पष्टता नाही. लोकांच्या रोजीरोटीवर काय परिणाम होतोय याचा विचार केंद्र सरकारकडून होत नाही. देशात सहमतीचे राजकारण होताना दिसत नाही. भारत-चीन सिमवेर सध्या वाद सुरु आहे. पंतप्रधान मोदी हे चीन सैन्य भारतीय हद्दीत घुसले नाहीत असे सांगत आहेत, मग सैनिक शहीद कसे झाले ? याचे उत्तर त्यांनी देण्याची गरज आहे. संसदेचे अधिवेशन बोलवुन, विरोधी पक्षाबरोबर सहमती करुन त्यावर तोडगा काढण्याची गरज आहे. मात्र पंतप्रधान मोदी चर्चेला जायला तयार नाहीत. त्यामुळे देशात एकाधिकारशाहीचे काम सुरु आहे. लोकशाहीत प्रश्न विचारण्याचा अधिकार विरोधी पक्षाचा आहे. सरहद्दीवर जाऊन चीनचे नाव घ्यायला पंतप्रधान घाबरत आहेत. त्यांच्या एकाही भाषणात त्यांनी चीनचे नाव घेत नाहीत. बोटचेपी धोरण ते का घेत आहेत याबद्दल ते बोलायला तयार नाहीत. केंद्र सरकाराने राज्य सरकारला कायद्याप्रमाणे जीएसटीचा, वित्त आयोगाचा वाटा तातडीने दिला पाहिजे. तरच राज्य नागरीकांचे उत्तरदायीत्व पुर्ण करु शकेल. 


लाल किल्यावर भाषणासाठीच खटाटोप

जगात कोठेही कोरोनावर लस उपलब्ध नाही. देशातील संशोधकांनी लसीची चाचणी महिन्याभरात करण्याची कार्यवाही सुरु करणार असल्याचे म्हंटले आहे. त्यासाठी अजुनही बराच कालावधी लागणार आहे. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 15 ऑगस्टपासून रुग्णांना लस टोण्यास प्रारंभ करणार असल्याचे जाहीरपणे सांगत आहेत. त्यांना लाल किल्यावरुन भाषण करुन चीनने व्हायरस जगाला दिला आणि त्याचे उत्तर आम्ही शोधले हे त्यांना सांगायचे आहे, हे सांगण्यासाठी खटाटोप सुरु आहे, असाही आरोप आमदार श्री. चव्हाण यांनी केला.

हत्ती गेला अन्‌ शेपूट राहिले, 'यांच्या' कर्जमाफीचे पैसे द्यायचे काेणाला?  

100 युनीट मोफत वीजची मागणी 

वीजेची मागील तीन महिन्यांची वीज बिलांचे रिडींग घेता आले नाही. बिले सरासरी करुन देण्यात आल्या आहेत. मध्यंतरी वीज आयोगाने वीजेची दरवाढ केली होती. त्या सर्वांचा विचार करुन मुख्यमंत्री, उर्जामंत्र्यांशी चर्चा करुन त्यावर काही सुट देता येईल का यावर विचार सुरु आहे, असे सांगून आमदार चव्हाण यांनी आमची तर 100 युनीट वीज मोफत द्यावी, अशी आमची मागणी असल्याचे सांगितले.

इंधन दरवाढविरोधात पृथ्वीराज यांचे कऱ्हाडात बैलगाडीतून आंदोलन 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com