

जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे २२ एप्रिल रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्याला देश अद्याप विसरलेला नाही. या हल्ल्यात २८ जणांचा मृत्यू झाला. तर अनेक जण रुग्णालयात दाखल आहेत. या घटनेनंतर सरकार सातत्याने कठोर पावले उचलत आहे आणि तपास यंत्रणा सक्रिय आहेत. गुप्तचर यंत्रणांनी जम्मू-काश्मीरमधील स्थानिक दहशतवाद्यांची यादी तयार केली आहे.