'एसएसबी'चे जवान 'आयबी'कडे वर्ग 

'एसएसबी'चे जवान 'आयबी'कडे वर्ग 

नवी दिल्ली : सशस्त्र सीमा बलाच्या (एसएसबी) दोन हजार जवानांना इंटेलिजन्स ब्यूरोकडे (आयबी) वर्ग करण्यात आले. भारतीय सीमेवरील मनुष्यबळ वाढवून "आयबी'ची ताकद वाढविण्याच्या केंद्र सरकारच्या योजनेचा हा एक भाग मानला जात आहे. 

वर्ग करण्यात आलेले जवान हे "एसएसबी'च्या नागरी विभागातील आहेत. केंद्र सरकारने 12 ऑक्‍टोबरला याबाबत आदेश जारी केला असून यानुसार "एसएसबी'मधील 2,104 जवानांना तातडीने "आयबी'मध्ये हलविण्यास सांगण्यात आले. 

"एसएसबी'च्या नागरी विभागातील या मनुष्यबळाचा सीमा सुरक्षा वाढविण्यासाठी परिणामकारकरीत्या करणे गरजेचे आहे, असे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित दोवाल यांनी जून 2016 मध्येच केंद्रीय गृह सचिवांना पत्र लिहून कळविले होते. तेव्हापासून याबाबत ठळकपणे विचार सुरू होता. सरकारच्या आदेशानुसार, "एसएसबी'च्या नागरी विभागातील 24 तुकड्यांपैकी 19 तुकड्या "आयबी'कडे वर्ग करण्यात आल्या आहेत. 

"एसएसबी'च्या या जवानांना सीमा रेषेवरील भौगोलिक परिस्थितीचे चांगले प्रशिक्षण मिळाले असल्याने त्यांच्या या कौशल्याचा आणि क्षमतेचा सीमा रेषा अधिक सुरक्षित करण्यासाठी केला जावा, असे दोवाल यांचे म्हणणे होते. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com