अयोध्या प्रकरणाची सुनावणी 25 जुलैपासून

Supreme Court
Supreme Court

नवी दिल्ली : अयोध्येतील रामजन्मभूमी आणि बाबरी मशीद वादाप्रकरणी आज (गुरुवार) सर्वोच्च न्यायालयात झालेल्या सुनावणीत न्यायालयाने मध्यस्थांना अहवाल देण्याचे आदेश दिले असून, आता या प्रकरणाच्या सुनावणीला 25 जुलैपासून सुरवात होणार आहे.  

आज सर्वोच्च न्यायालयात या प्रकरणी सुनावणी झाली. या दरम्यान या वादातून तोडगा काढण्यासाठी आम्ही मध्यस्थांची समिती नेमली आहे. या समितीने आपला अहवाल सादर करावा, अन्यथा २५ जुलैपासून सुनावणीला सुरुवात होईल, असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे.

मध्यस्थ नेमण्याचा जो निर्णय न्यायालयाने घेतला होता. मात्र मध्यस्थांच्या समितीकडून या प्रश्नावर जो तोडगा काढला होता त्याने कुणाचेही समाधान झालेले नाही असे याचिकाकर्त्यांनी म्हटले होते. मात्र आम्ही मध्यस्थांच्या समितीने अहवाल देण्याची १८ जुलैपर्यंत वाट पाहू अन्यथा २५ जुलैपासून सुनावणी घेऊ असे न्यायालयाने स्पष्ट केले आहे. 

अयोध्येतील रामजन्मभूमी आणि बाबरी मशीद खटल्यातील सर्वांत जुने आणि अस्सल प्रतिवादी गोपालसिंह विशारद यांनी याप्रकरणी न्यायालयाने तातडीने तोडगा काढावा, अशी विनंती सर्वोच्च न्यायालयाकडे केली आहे. या प्रकरणावर सामंजस्याने तोडगा काढला जावा म्हणून हे प्रकरण मध्यस्थांच्या तीन सदस्यीय समितीकडे सोपविण्यात आले होते, याचे नेतृत्व सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश एफ. एम. आय. कालिफुल्ला करीत असून, याप्रकरणी अद्याप काहीही ठोस कारवाई झाली नसल्याचे त्यांनी नमूद केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com