नवी दिल्ली : एअर इंडियाच्या कर्मचाऱ्यांसाठी आता टाटाकडून खूशखबर देण्यात आली आहे. एअर इंडियामध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना आता पगारवाढ देण्यात येणार आहे. डबघाईला आलेली सरकारची एअर इंडिया कंपनी टाटाने काही दिवसांपूर्वी खरेदी केली होती. त्यानंतर आता कर्मचाऱ्यांसाठी पगारवाढ करण्यात आली आहे.
काही दिवसांपूर्वीच टाटाने या कंपनीला आपल्या मालकीखाली घेतलं होतं. गेल्या दोन वर्षात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर या कंपनीला चांगलाच आर्थिक फटका बसला होता. आता पुन्हा आंतरराष्ट्रीय वाहतूक सुरु झाल्याने विमान वाहतूक क्षेत्र सावरताना आपल्याला दिसत आहे. त्यानंतर एअर इंडियाने दिलेल्या माहितीनुसार कोरोनाकाळात वैमानिकांचा उड्डाण भत्ता, विशेष वेतन आणि वाइड बॉडी भत्ता अनुक्रमे ३५ टक्के, ४० टक्के आणि ४० टक्क्यांनी कपात करण्यात आली होती. त्यानंतर १ एप्रिलपासून हे भत्ते अनुक्रमे २०, २५ आणि २५ टक्क्यांपर्यंत करण्यात येणार आहेत.
तसेच कोरोनाच्या दरम्यान केबिन क्रू मेंबर्सचा उड्डाण भत्ता आणि वाईड बॉडी भत्ता हा १५ आणि २० टक्क्यांनी कमी करण्यात आला होता. हे दोन्ही भत्ते १ एप्रिलपासून १० आणि ५ टक्क्यांनी वाढवण्यात येणार आहेत. कोरोनाकाळात अधिकारी आणि इतर कर्मचाऱ्यांना देण्यात येणाऱ्या भत्त्यात सुमारे ५० आणि ३० टक्क्यांनी कपात करण्यात आली होती. त्यांच्या भत्त्यात आता वाढ केली जाणार असून कर्मचाऱ्यांच्या भत्त्यात २५ टक्क्यांची वाढ करण्यात येणार असून इतर कर्मचाऱ्यांचे भत्ते हे कोरोनाच्या आधी जेवढे होते तेवढे करण्यात येणार आहेत.
दरम्यान पायलट, केबिन क्रू आणि त्यांच्या विभागातील इतर कर्मचाऱ्यांना मिळणाऱ्या भत्त्याच्या दरामध्ये कोणताही बदल करण्यात येणार नाही, असं कंपनीने स्पष्ट केलं आहे.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.