नवी दिल्ली - आगामी काळात बिहारच्या राजकारणाची घडी कशी बसणार, याचे अडाखे बांधण्यात येत आहेत. राज्यात नितीशकुमार यांच्या नेतृत्वाखाली जेडीयू आणि आरजेडी आघाडीचे सरकार आहे, पण आता राजदच्या एका आमदाराने मोठा दावा केला आहे.
राष्ट्रीय जनता दलाचे आमदार विजय मंडल यांनी दावा केला की, पुढील महिन्यात होळीनंतर तेजस्वी यादव यांना राज्याचे मुख्यमंत्री केले जाऊ शकते. मुख्यमंत्री नितीशकुमार स्वत: त्यांच्याकडे सत्ता सोपवतील, असेही ते म्हणाले. या दाव्यानंतर राज्याच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. मात्र जेडीयूचे प्रदेशाध्यक्ष ललन सिंह यांनी हा दावा खोटा असल्याचे सांगत अद्याप असा कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही, असे म्हटले आहे.
ललन सिंह यांनी म्हटलं की, पुढची विधानसभा निवडणूक 2025 मध्ये होणार आहे. नितीशकुमार म्हणाले होते की, 2025 च्या निवडणुकीत तेजस्वी यादव युतीचे नेतृत्व करतील. याचा अर्थ त्यांच्या नेतृत्वाखाली युती निवडणूक लढवणार, पण राज्याचा मुख्यमंत्री कोण होणार हे आमदार ठरवतील. सध्या बिहारमध्ये निवडणुका होणार नाहीत, असही त्यांनी नमूद केलं.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.