2 कोटी तरूणांनी भजी केली तर ती खाणार कोण? : तेजस्वी यादव

tejaswi yadav
tejaswi yadav

नवी दिल्ली : 'तरूणांनी भज्यांचा व्यवसाय सुरू करायला हवा' असा सल्ला पंतप्रधान मोदींनी दिला होता, तसेच मोदींनी तरूणांना दिलेल्या खोट्या आश्वासनांवर टीका करत राष्ट्रीय जनता दल पक्षाचे नेते तेजस्वी यादव यांनी मोदी सरकारवर पुन्हा एकदा शरसंधान साधले आहे. 

रोजगारनिर्मिती, काळ्या पैशाचे उच्चाटन, भ्रष्टाचारावर नियंत्रण, 15 लाख रूपये प्रत्येकाच्या खात्यात जमा करणार अशा अनेक आश्वासनांची पूर्ती मोदी सरकार करू शकले नाही, तसेच मोदींनी दरवर्षी 2 कोटी नोकऱ्यांची निर्मिती होईल असे आश्वासन दिले होते, पण आता ते तरूणांना भजी तळायला सांगत आहेत, पण इतक्या तरूणांनी भजी तळली तर ती खाणार कोण असा सवाल तेजस्वी यांनी एनडीटीव्हीच्या एका कार्यक्रमात उपस्थित केला. 

'आम्हीच 50 वर्षे सत्तेत राहू' या भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी केलेल्या वक्तव्यावरही त्यांनी टीका केली. पण सर्व विरोधक एकत्र येतील व भाजपची ही मनमानी चालू देणार नाही, असेही त्यांनी यावेळी सांगितले.  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com