काश्‍मीरमध्ये अपहरण केलेल्या तीन पोलिसांची हत्या 

representational image
representational image

श्रीनगर : दक्षिण काश्‍मीरमधील शोपियां येथून अपहरण केलेल्या तीन पोलिसांची दहशतवाद्यांनी हत्या केली. या तिघांचेही मृतदेह आज (शुक्रवार) पहाटे हाती लागले. 

दहशतवाद्यांनी 30 ऑगस्ट रोजी आठ नागरिकांचे अपहरण केले होते. या सर्वांचे नातेवाईक जम्मू-काश्‍मीर पोलिस दलात कार्यरत आहेत. त्यानंतर काही दिवसांनी अपहरण केलेल्यांची सुटका करण्यात आली होती. 

कर्पन गावातील चार पोलिसांच्या घरात पहाटे दहशतवादी घुसले. त्यापैकी एका पोलिसाने गावकऱ्यांच्या मदतीने सुटका करून घेतली. या पोलिसांनी नोकरी सोडून द्यावी, अशी धमकी दहशतवाद्यांनी दिली होती. त्यानंतर काही वेळाने तीन पोलिसांचे मृतदेह आढळले. 

पोलिसांचे नातेवाईक लक्ष्य!
हिज्बुल मुजाहिदीन या दहशतवादी संघटनेचा कमांडर रियाझ नाईकू याने 12 मिनिटांचा एक व्हिडिओ प्रसिद्ध केला होता. पोलिसांच्या ताब्यात असलेल्या दहशतवाद्यांच्या नातेवाईकांची सुटका करण्याची मागणी त्याने त्या व्हिडिओद्वारे केली होती. 

सय्यद सलाहुद्दीन या कुख्यात दहशतवाद्याच्या मुलास 'एनआयए'ने अटक केली होती. त्याच्यावर दहशतवादी कारवायांसाठी निधी गोळा केल्याचा आरोप आहे. यानंतर हिज्बुल मुजाहिदीनने पोलिसांच्या नातेवाईकांना लक्ष्य करण्यास सुरवात केली. 

राजकारणास सुरवात! 
तीन पोलिसांच्या हत्येची बातमी आल्यानंतर काही मिनिटांतच जम्मू-काश्‍मीरच्या माजी मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती यांनी केंद्र सरकारला लक्ष्य केले. 'पोलिस, त्यांचे नातेवाईक यांच्यावर हल्ले होण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. बळाचा वापर करण्याची केंद्र सरकारची योजना अपयशी ठरत आहे. चर्चा हे या समस्येवरील एकमेव उत्तर आहे', असे मुफ्ती म्हणाल्या.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com