बालाकोटच्या कारवाईनंतर दहशतवाद्यांमध्ये थरकाप : पंतप्रधान

बालाकोटच्या कारवाईनंतर दहशतवाद्यांमध्ये थरकाप : पंतप्रधान

कानपूर : ''भारतीय हवाई दलाने पाकिस्तानातील बालाकोट येथे केलेल्या एअर स्ट्राईकच्या कारवाईनंतर दहशतवाद्यांमध्ये थरकाप उडाला आहे. जम्मूमध्ये झालेल्या आणखी एका दहशतवादी हल्ल्यामुळे हे सिद्ध होत आहे'', असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (शुक्रवार) सांगितले. 

उत्तर प्रदेशातील कानपूर येथे आयोजित एका रॅलीला संबोधित करताना पंतप्रधान मोदी बोलत होते. ते म्हणाले, ''पाकिस्तानातील बालाकोट येथे भारतीय हवाई दलाने केलेल्या कारवाईनंतर दहशतवाद्यांमध्ये थरकाप उडाला आहे. याचेच उदाहरण म्हणजे जम्मूच्या बसस्थानकावर दहशतवाद्यांनी ग्रेनेड हल्ला केला. दहशतवाद्यांविरोधात सर्व आवश्यक कारवाई करण्यास सरकारकडून पावले उचलली जात आहेत. त्यामुळेच दहशतवाद्यांमध्ये भीती निर्माण झाली आहे. आमचे सरकार देशाप्रती आमची असलेली जबाबदारी पूर्ण करण्यासाठी कर्तव्यबद्ध आहे'', असेही ते म्हणाले. 

तसेच ते पुढे म्हणाले, ''लखनौमध्ये राहणाऱ्या काश्मिरी नागरिकांच्या संरक्षणासाठी योगी सरकारने जी पावले उचलली, त्याबद्दल मी त्यांचे मनापासून अभिनंदन करतो. याशिवाय, मी इतर राज्यांतील सरकारांनाही सांगू इच्छितो, की अशाप्रकारच्या कारवाया करणाऱ्यांविरोधात कडक पावले उचलावीत. 'एकी'च्या मंत्राने आपण दहशतवादाशी सामना करू''. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com